HW News Marathi
राजकारण

चार वर्षानंतर भाजपला शिवसेनेची ताकत कळाली | संजय राऊत

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘नुकतीच पालघर लोकसभा पोटनिवडणूक झाली असून यात भाजपला शिवसेनेची खरी ताकद कळाल्यामुळे चार वर्षानंतर पहिल्यांदाच मातोश्रीची आठवण आली आहे. परंतु, शिवसेना आगामी निवडणुका ‘स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर ठाम’, असल्याचा देखील यावेळी राऊत म्हणालेत.

ही भेट होण्यापुर्वी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सध्या मुंबईत भाजपचे संपर्क अभियान सुरु आहे. या संपर्क अभियाना अंतर्गत अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान अमित शहा उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.

देशात भाजप विरोधी वारे वाहू लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भाजपने मित्र पक्षांची नाराजी दूर करायला सुरुवात केली आहे. याचा श्री गणेशा शिवसेनेपासून भाजप करत असल्याचे पहायला मिळत आहे. केंद्रत भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्र पक्षांना डावलले होते. त्यामुळे शिवसेनेने नाराजीचा सुर आळवला होतो. अमित शहा शिवसेनेला भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करणार का? याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

किती दलित, आदिवासी, मुस्लिमांना भारतरत्न मिळाले ?

News Desk

“मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक टोला

Aprna

राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली ?, अमित शहांचा सवाल

News Desk
देश / विदेश

देशात १९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही | शरद पवार

News Desk

मुंबई : १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. इंदिरा गांधी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. यानंतर गांधी यांचे सरकार विरोधी पक्षांनी पाडले होते. त्यामुळे १९७७ सारखी पुनरावृत्ती होण्यास फार वेळ लागणार नाही, असे भाकित राष्ट्रीवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत १० जागांपैकी ९ जागावर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा देशातील ४ राज्यात विधान सभा निवडणुका पार पडल्या आहेत. या ४ राज्यापैकी फक्त त्रिपूर राज्यात भाजपची सरकार आहे. इतर तीन राज्यात भाजपला स्पष्ट असे बहुमत मिळाले नसल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. सध्या देशात भाजप विरोधी वारे वाहू लागले आहेत.

 

Related posts

दिल्लीतील अनाज मंडी परिसरात भीषण अग्नितांडव, ४३ जणांचा मृत्यू

News Desk

वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल,मग बसा बोंबलत! – सामना

News Desk

दिल्ली उच्च न्यायालयाला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी 

News Desk