HW News Marathi
राजकारण

अन् राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा तर…!

मुंबई | “राज्यात १०१ टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. आम्हाला त्याबाबत कोणतीही शंका नाही. थोड्या फार चर्चा सुरु आहेत. त्या चर्चा लवकरच पूर्ण होतील. आमच्यात इतके धैर्य आहे आणि आम्हाला असा पूर्ण विश्वास आहे कि उद्धव ठाकरे जो काही निर्णय घेतील तो आमच्या सर्वांच्या हिताचाच असेल. अन् राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा कि, शरद पवार कुठे जातात, का जातात, कोणाला भेटतात ? तर तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याबाबत काहीही बोलू शकत नाही, त्यांना रोखू शकत नाही”, असे विधान शिवसेना आमदार अब्दुल सत्तर यांनी केले आहे. राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यावर अब्दुल सत्तार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्हाला शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीसाठी ओळखपत्रांसह ५-६ दिवसांसाठीचे कपडे आणण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. तेथे आम्हाला उद्धव ठाकरे पुढच्या सर्व गोष्टींसंदर्भात सूचना देतील. पुढची संपूर्ण रणनिती ठरविण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी आम्हाला शुक्रवारी मुंबईत बोलावले आहे”, अशीही माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, “मला वाटते कि आता सरकारला अंतिम रूप द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे, आता राज्यात लवकरच एक स्थिर आणि ५ वर्षे टिकणारे सरकार लवकरच अस्तित्त्वात येईल. हे सरकार आधीच्या सरकारपेक्षा निश्चित चांगले असेल”, असा विश्वासही अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या, अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखीच क्लिष्ट होत चालल्याचे चित्र असले तरीही शिवसेनेकडून मात्र लवकरच सरकार स्थापन होईल, असा दावा केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील “राज्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली एक स्थिर आणि लोकप्रिय सरकार स्थापन होईल”, असा दावा केला आहे. मात्र, आता केवळ सरकार स्थापन कधी होणार ? त्यासाठीचे चित्र कधी स्पष्ट होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंना आमदार सोडून गेले तर उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत ?”, चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

Aprna

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत अन् राहतील !

News Desk

पक्षातील ‘गद्दारांना’ शोधा, ममता बॅनर्जींचा आदेश

News Desk