HW News Marathi
राजकारण

#AyodhyaCase | अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

नवी दिल्ली | संपूर्ण देशासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी (९ नोव्हेंबर) बहुप्रतीक्षित अशा अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणाच्या या निकालाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता अयोध्या प्रकरणाचा निकाल हाती येईल अशी माहिती मिळत आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता केंद्राकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशभरातील सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशासह मुंबईतील रेल्वे स्थानकांवर देखील अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, अति गर्दी आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. अब्दुल नजीर या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील नंबर १ च्या कोर्टात या निकालाची सुनावणी होणार आहे. अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी यावर्षी ५ ऑगस्टपासून सुरु झाली होती. तर १६ ऑक्टोबरला अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशमधील परिस्थितीचा आढावा देखील घेतला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीपूर्वीच या प्रकरणाचा निकाल लागेल, अशी माहिती यापूर्वी मिळत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेठीत राहुल गांधी राम तर मोदी रावणाच्या रुपातील पोस्टर वॉर

swarit

आता जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल !

News Desk

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात !

News Desk