HW News Marathi
राजकारण

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच विश्वासू सेवकाला अटक

इंदूर | मध्य प्रदेशचे अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर फरार असलेला त्यांचा सेवक विनायक दुधाळे याला अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विनायक दुधाळे हा भय्यू महाराज यांचा अत्यंत विश्वासू सेवक होता. विनायक दुधाळेच्या अटकेमुळे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होण्यास आता मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. भैय्यूजी महाराज यांच्या मुलीने त्यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्याची मागणी केली होती.

भैय्यू महाराज यांनी १२ जून रोजी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून भैय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली होती. भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वीचे अनेक दिवस जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर राहणे पसंत केले होते. भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज देखील वर्तविला जात होता. त्याचप्रमाणे भैय्यू महाराज हे अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले होते, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी हेमंत करकरे यांना म्हटले होते की त्यांचा सर्वनाश होईल !

News Desk

“…आपण उगाच टाहो फोडतो”, उद्योगासंदर्भात राज ठाकरेंचे मोठे विधान

Aprna

देशभरात ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk
देश / विदेश

धुक्यामुळे हरयाणामध्ये भीषण अपघात

News Desk

नवी दिल्ली | हरयाणामध्ये शनिवारी सकाळी दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हरयाणातील अंबाला-चंदीगड मार्गावर शनिवारी सकाळी हा अपघात झाला आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चंदीगडवरून येणाऱ्या दोन कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे.

या पुर्वी देखील हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला होता. रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले होते.

Related posts

#PulwamaAttack | मातृभूमीसाठी जम्मूतील डॉक्टरांनी घेतली ‘ही’ प्रतिज्ञा

News Desk

लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरविला

Aprna

विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची राष्ट्रपतींना विनंती! – रामराजे नाईक-निंबाळकर

Aprna