HW News Marathi
राजकारण

भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगढच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली | भूपेश बघेल यांनी आज (१७ डिसेंबर) छत्तीसगढच्या मुख्यमंत्री पदाची शपथ लागली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी बघेला यांना गोपनीयतेची शपथ दिली. बघेल यांच्यासोबत टी एस सिंहदेव आणि ताम्रध्वज साहू यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. शपथविधीच्या काही तास आधीच पाऊस सुरु झाल्याने शपथविधीचे स्थळ बदलण्यात आले. हा सोहळा सायंन्स कॉलेज मैदानावर होणार होता. मात्र, ऐनवेळी बलवीर सिंह जुनेजा इनडोअर स्टेडिअमवर हा सोहळा घेण्यात आला.

राजस्थानमध्ये सकाळी १०.३० वाजता अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये सायंकाळी चार वाजता कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी मध्य प्रदेशाच्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा मोठा निर्णय घेतला. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेता मोतीलाल वोरा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तुमचा देखील ‘पानसरे-दाभोळकर’ करु, भूजबळांना धमकी

News Desk

ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी, संदीप नाईक यांची माघार

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपच्या ४२ स्टार प्रचारकांची नावे जाहीर

News Desk
राजकारण

फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसविले | सुप्रिया सुळे

News Desk

मुंबई | राज्यातील धनगर समाजाला शेड्यूल्ड ट्राईब अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्यासंदर्भातला प्रस्तावच राज्य सरकारने पाठविला नसल्याची माहिती जनजातीय मंत्रालयाने लोकसभेत दिल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाची फसवणूकच केली असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

धनगर आरक्षणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज(१७ डिसेंबर) लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असता जनजातीय कार्यमंत्रालयाने यावर उत्तर देताना धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रस्तावच पाठवलेला नाही असे स्पष्ट केले. सत्तेवर येताक्षणीच आरक्षण देवू असे आश्वासन देणाऱ्या भाजपने आपले आश्वासन पाळले नाही. निवडणूकीनंतर तातडीने हा प्रस्ताव त्यांनी केंद्राकडे पाठविला असता तर आत्तापर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान मिळाले असते. फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत प्रस्ताव न पाठवून खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे दाखवून दिले असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

धनगर आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही आणि या मुद्दयावर धनगर समाजाची फसवणूक होत असल्याची प्रचिती आज संसदेत आली. सत्तेवर येताक्षणीच आरक्षण देवू असे आश्वासन देणाऱ्या भाजपने आपले आश्वासन पाळलेले नसून धनगर समाजाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related posts

कुमारस्वामी ‘अ‍ॅक्सिडेंटल सीएम’, भाजपचा टोला

News Desk

२०१९ साल संपण्यापूर्वी राम मंदिराचे काम सुरू करावे !

News Desk

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे निधन

News Desk