HW News Marathi
राजकारण

भाजपला चढलेली सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी | सुप्रिया सुळे

जळगाव | राज्यात महिला व कामगारांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सत्ताधारी मंत्री व लोकप्रतिनिधी असंवेदनशील विधाने करीत आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे, ती मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी असल्याचे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केले. सुप्रिया सुळे तीन दिवसांच्या दौऱ्यावर जळगावाला गेल्या होत्या, गुरुवारी दुपारी त्यांनी जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषदेत हजेरी लावली. या वेळी खासदार सुळे यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजपचे केवळ निवडणूक जिंकणे हेच लक्ष्य आहे असा टोमणा पत्रकार परिषदेत सुप्रियाने मुख्यमंत्रींना मारला. मुख्यमंत्र्यांच्या दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करू या विधानावर,तीन आठवडे का वाट पाहतात. आत्ताच दुष्काळ का जाहीर करीत नाहीत, असा सवाल खासदार सुळे यांनी उपस्थित केला. असा टोलाही खासदार सुळे यांनी लगावला.

देशाचा इतिहास गिरीश महाजन यांनी वाचलेला नाही

महात्मा गांधी हे भाजपच्या विचारांचे होते, या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यवर देशाचा इतिहास गिरीश महाजन यांनी वाचलेला दिसत नाही, त्यामुळे असे वक्तव्य करीत आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, तिलोत्तमा पाटील, कल्पना पाटील, मंगला पाटील, मीनल पाटील, कल्पिता पाटील, राजेश पाटील आदी उपस्थित होते. जळगाव लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉ. राजेश पाटील यांचा गुरुवारी सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

बहिणाबाईंचे स्मारक अजून अपूर्णच कसे ?

जळगाव दौऱ्यावर असताना खाजदार सुळे यांनी असोद्याला बांधत असलेल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाची पाहणी केली. स्मारकाचे बांधकाम अजून पूर्ण न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपावर संताप व्यक्त केला आहे. आघाडी सरकारने बहिणाबाईंचे स्मारक मंजूर करून पहिल्या टप्प्याचा निधी तत्काळ दिला असून बांधकाम अजून अपूर्णच कसे ? असा प्रश्न सुळे यांनी केला.भाजप सरकारने या स्मारकाचे काम जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवण्याचे पाप केल्याचा आरोपदेखील खासदार सुळे यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका

Aprna

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk

अन् भाषणादरम्यान हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

News Desk