HW News Marathi
राजकारण

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

पंढरपूर | राफेल डील हा घोटाळाप्रमाणे पीक विमा योजनेमध्येही मोठा घोटाळा झाला असल्याचा सवाल उपस्थिती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला आहे. पंढरपूरच्या जाहीर सभेत म्हटले आहे. पुढे ठाकरे असे म्हणाले की, मराठवाडा विदर्भात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. केंद्राच्या पथकाने पाहणी केली मात्र शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना कुठे गेल्या? असेही ते म्हणाले.पीक विमाच्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून बोगस पीक विमाच्या कंपन्यांवर कारवाई करा, असे त्यांनी यावेळी सांगितल.

यावरून कांदा प्रश्न कशी सोडवताय? पीक विमा कधी देताय ते सांगा? कर्जमाफ केलेला शेतकरी दाखवा असा खडा सवाल करत या गोष्टी पहिल्यांदा पूर्ण करा, नंतर बाकीचे बघू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मला सत्ता नसली तरी चालेल, परंतु इथला शेतकरी सुखी राहायला हवा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच जानेवारीपासून उद्धव ठाकरे स्वतः दुष्काळग्रस्त भागात फिरणार आहे.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी राफेल घोटाळ्यावरूनही भाजप सरकारव टीका केली. ठाकरेंनी म्हटले की, सैन्यासाठी विमाने खरेदी करता त्यात तुम्ही घोटाळे करता. दुसरीकडे सैन्याची पगारवाढ प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आहे. सैन्याची पगारवाढ नाही आणि शस्त्र सामग्रीत घोटाळा करता, किती पापे कराल, असे म्हणत जय जवान- जय किसानचा नारा खोटा ठरवला आहे, असे ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

EVMHacking : मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो !

News Desk

अमोल कोल्हेंचा शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश, आज अधिकृत घोषणा

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : मतदार यादीतून नावे गहाळ

News Desk