HW News Marathi
राजकारण

सुंदर चेहऱ्यांमुळे मते मिळत नाहीत !

पाटणा |सुंदर चेहऱ्यांमुळे मते मिळत नाहीत,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री विनोद नारायण झा यांनी केले आहे. प्रियांका गांधी यांची नुकतीच काँग्रेसने पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव पदी नियुक्ती केली आहे. भाजप नेते झा यांनी प्रियांकाच्या नियुक्तीबाबत म्हटले की, “सुंदर चेहऱ्यांमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत, तसेच प्रियांका यांच्या पती रॉबर्ट वाड्राच्या नाववर जमीन घोटाळ्यात पुढे आले आहे.”

प्रियांका गांधी या दिसायला खूप सुंदरआहेत. त्यांच्या राजकारणात एन्ट्रीने काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत जागा जिंकता येतील, या भ्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहू नये. देशातील लोकशाही परिपक्व होत आहे, अशा शब्दात विनोद नारायण झा यांनी प्रियांका गांधींना टोला लगावला आहे. प्रियांकाच्या राजकारणातील प्रवेशानंतर अनेक जणांनी इंदिरा गांधींसोबत त्यांची तुलना करण्यास सुरुवात केली आहे.

प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशावर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनीही भाष्य केले. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या आघाडीला घाबरवण्यासाठी प्रियांका गांधींनी राजकारणात आणले गेल्याचे कुमार मोदी म्हणाले. ‘प्रियांका गांधी रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रतिनिधी म्हणून राजकारणात आल्या आहेत. त्यामुळे आता वाड्रा यांचा मुद्दा प्रकाशझोतात येईल,’ असे सूचक विधान त्यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक पदवीधर निवडणुकीत ‘मविआ’कडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर

Aprna

“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा महाराष्ट्राशी सामंजस्य करार झाला नव्हता”, उदय सामंतांचा धक्कादायक खुलासा

Aprna

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलं अर्थसंकल्प सादर होणार; शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या वाटेला काय येणार?

Aprna