HW News Marathi
राजकारण

भाजपकडून लोकांचा कौल बदलण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात !

नवी दिल्ली | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरला मतदान झाले. मात्र काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता या मतदानाबाबत एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे. “भाजपला आपला पराभव होणार हे कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपकडून लोकांचा कौल बदलण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात”, अशी भीती ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी तातडीने कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करून इव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे सिंधिया यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/JM_Scindia/status/1068762393671536640

ज्या स्ट्राँग रूममध्ये या इव्हीएम मशीन्स ठेवण्यात आल्या आहेत त्या रूमला कडेकोट सुरक्षा देण्यात यावी, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. भोपाळमधील स्ट्राँग रूमच्या बाहेर लावलेली एलइडी बंद पडणे, सागर जिल्ह्यात गृहमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात राखीव इव्हीएम मशीन तब्बल ४८ तास उशिरा पोहोचणे, सटणा-खरगोन येथे अज्ञात बॉक्समधून इव्हीएम स्ट्राँग रूममध्ये नेण्यात येत असल्याचा व्हिडीओ हे सर्व एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप सिंधिया यांनी ट्विटरवरून केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस आता तीच चूक महाराष्ट्रात करायला जात आहे !

News Desk

शहा, उद्धव बैठक अखेर संपली, दोन तास झाली दोघांमध्ये चर्चा

swarit

“निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजे”, उद्धव ठाकरेंनी केली मागणी

Aprna
मुंबई

अदानीकडून मीटर तपासणी न करताच वीजबिलांचे वितरण ?

News Desk

मुंबई | अदानी कंपनीकडून मुंबई उपनगरात वीजपुरवठा केला जातो. अदानी कंपनीने प्रत्यक्ष मीटरची तपासणी न करताच वीजबिल दिल्याने नागरिक संतापले आहेत. दरम्यान वीजबिलांमध्ये तब्बल ५० ते १०० टक्के दरवाढ करण्यात आल्याच्या तक्रारींची दखल घेत एक समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या ऊर्जामंत्र्याना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या पुढीलप्रमाणे :

  • अदानी कंपनीकडून गेल्या तीन महिन्यात देण्यात आलेल्या विजेच्या बिलांचे ऑडिट करण्यात यावे.
  • विजेची बिलं ही मीटर तपासणी करून दिल्याचे पुरावे सादर करावेत.
  • तपासणी न करता सरासरीने पद्धतीने किती बिलं वितरित करण्यात आली आहेत, याची आकडेवारी द्यावी
  • जास्त रकमेची बिलं देण्यात आलेल्या ग्राहकांना याबाबतची माहिती देऊन अतिरिक्त रकमेचा व्याजासहित परतावा द्यावा
  • पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी राज्य वैधमापन विभागाला वीज मीटर आणि बिलांचे ऑडिट करण्याचे निर्देश द्यावेत.
  • राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत
  • अधिकारी, तज्ज्ञ, ग्राहक संघटना यांची एक समिती स्थापन करून या प्रकरणाची तपासणी करावी.
  • या समितीचा अहवाल ३ महिन्यांत जनतेसमोर मांडावा

Related posts

रेल्वेला फेरीवाल्यांकडून दोन हजार कोटींचा हप्ता

News Desk

महापालिकेच्या पत्रकार कक्षाला कुलूप, मनसेचा पालिकेत धिंगाणा

News Desk

जागतिक पर्यावरण दिन : वर्सोवामध्ये ‘चला खारफुटी वाचवू या’ मोहीम

News Desk