HW News Marathi
राजकारण

महाभारतात इंटरनेट सेवा असल्याचा भाजप मंत्र्याचा दावा

आगरतळा | महाभारतात इंटरनेटचा वापर करण्यात आला होता असा अजब दावा त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी केलाय. आगरतळामध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावर अधिक बोलताना विप्लव कुमार देव म्हणाले, महाभारतात युद्धभूमीवर काय काय घडत आहे ते संजय धृतराष्ट्राला सांगत होता.

याचा अर्थ त्यावेळी इंटरनेट किंवा सॅटेलाईट तंत्रज्ञान वापरात होते. डोळ्यांनी एवढ्या लांबचे दिसू शकत नाही असेही यावेळी बोलताना विप्लव कुमार देव म्हणाले. आगरतळामध्ये मणिपूर, मिझोराम आणि मेघालयहून आलेल्या प्रतिनिधींना ते संबोधित करत होते.

अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांनी नव्हे तर भारतीयांनीच हजारो वर्षांपूर्वी इंटरनेटचा शोध लावल्याचेही ते म्हणालेत. ”तंत्रज्ञानात एवढं पुढे असलेल्या देशात जन्म घेतल्याचा मला गर्व आहे. जे देश स्वतःला तंत्रज्ञानात अग्रेसर मानतात, तेच भारतीयांना त्यांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी नोकरी देतात,” असेही विप्लव देव म्हणाले.

अशा प्रकारचे वक्तव्य करणारे त्रिपुराचे हे पहिलेच मुख्यमंत्री नाहीत तर यापूर्वीही केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवला होता. ”डार्विनचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे. शालेय अभ्यासक्रमातून तो बदलण्याची गरज आहे. माणूस जेव्हापासून पृथ्वीवर दिसला, तेव्हापासून तो माणूसच आहे,” असे अजब संशोधन सत्यपाल सिंह यांनी केले होते. यापूर्वी अनेकदा भाजपच्या या वाचाळ विरांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी टिकेचे लक्ष ठरले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार ?

News Desk

अब्दुल सत्तार गद्दार, चंद्रकांत खैरेंची घणाघाती टीका

News Desk

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जलील अनुपस्थित

News Desk