HW News Marathi
राजकारण

महाभारतात इंटरनेट सेवा असल्याचा भाजप मंत्र्याचा दावा

आगरतळा | महाभारतात इंटरनेटचा वापर करण्यात आला होता असा अजब दावा त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी केलाय. आगरतळामध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावर अधिक बोलताना विप्लव कुमार देव म्हणाले, महाभारतात युद्धभूमीवर काय काय घडत आहे ते संजय धृतराष्ट्राला सांगत होता.

याचा अर्थ त्यावेळी इंटरनेट किंवा सॅटेलाईट तंत्रज्ञान वापरात होते. डोळ्यांनी एवढ्या लांबचे दिसू शकत नाही असेही यावेळी बोलताना विप्लव कुमार देव म्हणाले. आगरतळामध्ये मणिपूर, मिझोराम आणि मेघालयहून आलेल्या प्रतिनिधींना ते संबोधित करत होते.

अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांनी नव्हे तर भारतीयांनीच हजारो वर्षांपूर्वी इंटरनेटचा शोध लावल्याचेही ते म्हणालेत. ”तंत्रज्ञानात एवढं पुढे असलेल्या देशात जन्म घेतल्याचा मला गर्व आहे. जे देश स्वतःला तंत्रज्ञानात अग्रेसर मानतात, तेच भारतीयांना त्यांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी नोकरी देतात,” असेही विप्लव देव म्हणाले.

अशा प्रकारचे वक्तव्य करणारे त्रिपुराचे हे पहिलेच मुख्यमंत्री नाहीत तर यापूर्वीही केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवला होता. ”डार्विनचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे. शालेय अभ्यासक्रमातून तो बदलण्याची गरज आहे. माणूस जेव्हापासून पृथ्वीवर दिसला, तेव्हापासून तो माणूसच आहे,” असे अजब संशोधन सत्यपाल सिंह यांनी केले होते. यापूर्वी अनेकदा भाजपच्या या वाचाळ विरांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी टिकेचे लक्ष ठरले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

News Desk

हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र प्रचाराच्या मैदानात

News Desk

बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पवारांच्या शुभेच्छा

News Desk
Uncategorized

राहुल गांधीं बरोबर हात मिळवणी सर्वांसमोर करेन !

News Desk

अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर हातमिळवणी करायची असेल तर ती सर्वांच्या समोर करेन असे सांगत राहुल गांधी बरोबर गुप्त बैठक झाल्याचे वृत्त पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल याने फेटाळून लावले आहे. एका खाजगी वृत्तवाहीनीने हार्दीक आणि राहुल यांची भेट झाल्याचे वृत्त दाखवले होते. शिवाय राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हार्दिक आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. त्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती.

हार्दीक पटेल यांना पाटीदार समाजाचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या प्रत्येक हालचालांवर सरकार आणि भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. हार्दिकचा पाठींबा मिळवण्यासाठी काँग्रेससह भाजपचे नेतेही प्रयत्नात आहेत. मात्र हार्दिक आणि त्याच्या सहकार्यांचा कल हा सध्या तरी काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट आहे. त्यातूनच राहुल आणि हार्दिकच्या भेटीचे वृत्त समोर आले आहे. शिवाय राहुल गांधी बरोबर हात मिळवणी करायची असेल तर ती सर्वां समोर करेन हे हार्दिक यांचे वक्तव्य सर्व काही सांगून जाते.

Related posts

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

Aprna

Aprna