HW News Marathi
राजकारण

भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल

मुंबई । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी मध्यरात्रीच अचानक मुंबईत दाखल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांची तातडीची बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वर्ळतुळात चर्चेला उधाण आले आहे.भाईंदरच्या रामभाऊ म्हाऴगी प्रबोधिनीमध्ये संघाच्या बैठका सुरु आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत म्हाऴगी प्रबोधिनीमध्ये शहा भागवत यांची भेट घेणार आहेत. शहा अचानक मध्यरात्री मुंबईत दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. म्हाऴगी प्रबोधिनीमध्ये आज सकाळपासूनच शहा आणि भागवत यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि राम मंदिर प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. विधानसभा निवडणुकांत राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. विद्यमान ४० आमदारांना डच्चू देण्यात येणार असल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : आज घराघरात “अबकी बार चौकीदार चोर है”च्या घोषणा !

News Desk

UP मध्ये मराठी भाषा शिकवा; भाजपच्या ‘या’ नेत्याने योगींना लिहिले पत्र

Aprna

साध्वी प्रज्ञा सिंहने सांगिलेत त्यांच्यावर तुरुंगात झालेले अत्याचार

News Desk
राजकारण

स्वबळाच्या नाऱ्याचा फटका शिवसेनेलाच ?

Gauri Tilekar

मुंबई | २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची घोर निराशा होणार असल्याचे एबीपी माझा-सी व्होटरने आॅक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र लढले तरी आजच्या स्थितीत भाजपच २३ जागा जिंकून पहिले स्थान पटकावेल. तर शिवसेनेला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या नाऱ्याचा सर्वाधिक फटका हा त्यांनाच बसू शकतो हे या सर्वेक्षणातून स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाली तर भाजपला ३४ जागा तर काँग्रेसला १४ जागांवर मिळतील. मात्र सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना २३ जागा, काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना १४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा तर शिवसेनेला सर्वात कमी म्हणजे ५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर केंद्रात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असे या सर्वेक्षणात म्हटले जात म्हटले गेले आहे.

Related posts

मधुकर कुकडेंनी घेतली शरद पवारांची भेट  

swarit

“जेव्हा आपण सत्तेत होतात…” केसरकरांचा उद्धव ठाकरेंच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहाणीवर टोला

Aprna

मर्यादित वेळेनंतर फटाके फोडल्याने मुंबईत २ अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल

Gauri Tilekar