HW News Marathi
राजकारण

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या चार जागा सोडण्याचा रिपाइंचा भाजपला प्रस्ताव

लखनौ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी त्यांच्या मंत्रालयातील दालनात लखनौ येथे भेट घेतली. या भेटीत उभय नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभा निकडणुकीबाबत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती निश्चित करणार असून युतीसाठी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप ने चार जागा सोडाव्यात असा प्रस्ताव यावेळी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला. उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत भाजपला रिपब्लिकन पक्षाची मोठी मदत झाली असून आगामी निवडणुकांत रिपाइंची साथ भाजपसाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगत लोकसभेच्या चार जागा रिपाइं ला सोडण्याच्या प्रस्तावावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी रामदास आठवलेंना यावेळी दिले.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे दोन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात लखनौ आणि बस्ती या जिल्ह्यांचा दौरा केला . रिपाइं च्या विविध सभांना संबोधित केले. तसेच उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल महामहिम राम नाईक यांची भेट घेतली. राज्यपाल राम नाईक यांच्याशी उत्तर प्रदेशातील मागसावसर्गीयांच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी यांची झालेली युती म्हणजे विळ्या भोपळ्याची युती आहे. बसपा आणि सपा च्या कार्यकर्त्यांना ही युती मान्य नसल्याने जागावाटपाच्या वादातून ऐन लोकसभा निवडणुकित सपा बसपा ची युती तुटेल त्याचा फायदा भाजप रिपाइं युती निश्चित होईल असे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला किमान 60 जागांवर विजय प्राप्त होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अकोल्याच्या जागेवरून युतीत तणाव निर्माण होणार ?

News Desk

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Aprna

युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

News Desk
शिक्षण

सम्यक विद्यार्थी संघटनेची मुंबई विद्यापीठात निदर्शने

News Desk

मुंबई | विश्व विद्यालय अनुदान आयोग बरखास्त करण्याच्या केंद्र सरकार च्या निर्णया निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुंबई विद्यापीठा समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. विश्व विद्यालय अनुदान आयोग बरखास्त न करता त्या मध्येच आवश्यक सुधारणा करण्यात याव्या अशी मागणी करत सम्यक विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याद्वारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांना निवेदन देण्यात आले.

प्रस्तावीत उच्च शिक्षण आयोगामध्ये अनेक त्रुटी असून सदर उच्च शिक्षण समितीतील सदस्यांची नेमणुक केंद्र सरकार करत असल्याने मोठ्या प्रमाणात नोकरशाह आणि राजकारण्यांचा यामध्ये हस्तक्षेप राहणार असून सदर समितीला मुक्तपणे काम करता येणार नाही. या उलट सरकारधार्जीन ही समिती राहणार असुन पुर्णता केंद्र सरकारच्या प्रभावाखाली उच्च शिक्षण समिती राहील. उच्च शिक्षण ओयोग गठीत करण्याचा निर्णय हा शिक्षण व्यवस्थेला एककेंद्रीकरणाचा असून हा निर्णय सरकारने एकाधिकारशाहीने घेतला आहे. असा अारोप सम्यक विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष अक्षय गुजर यांनी केला.

विश्व विद्यापीठ अनुदान आयागाचे आर्थिक अधिकारांची स्वायत्ता काढुन ते केंद्र सरकारकडे राहणार असल्याने महाविद्यालयांना अनुदान देताना निपक्षपातीपणाचा या ठीकाणी लवलेश ही राहणार नाही असे मत मुंबई सचिव आकाश दोडके यांनी मांडले.

त्याचप्रमाणे यापुर्वी महिविद्यालयांना संलग्नता देण्याचे अधिकार राज्यांना होते. परंतु सलंग्नता आता थेट उच्च शिक्षण आयोगाकडून मिळवावी लागणार. सदर अटी केवळ एककेंद्रीकरण दर्शवते असे मत सम्यक विद्यार्थी संघटनेचे प्रतीक साबळे(ठाणे अध्यक्ष) यांनी व्यक्त केले.

Related posts

सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के 

News Desk

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

शास्त्रीय कला , चित्रकला व लोककला सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना वाढिव गुण देणार :  राज्य शिक्षण मंडळ  

News Desk