HW News Marathi
राजकारण

भाजपचा मोठा विजय

जळगाव | मुक्ताईनगर नगरपंचायतीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाल्याचे पहायला मिळाले. या विजयाच्या निमित्ताने एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून विजयातून दाखवून दिले आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १३ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच शिवसेनेला ३ तर अपक्षांना १ जागा मिळाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नसल्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ला धडधडीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे भाजपचा विजय हा एकनाथ खडसेंचा मोठा विजय मानला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपच्या ‘या’ नेत्याने चक्क केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश !

News Desk

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम! – मुख्यमंत्री

Aprna

#MaharashtraElections2019 | बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप, संदीप क्षीरसागर आक्रमक

News Desk
देश / विदेश

अखेर मोदी सरकारने जिंकला विश्वास

News Desk

नवी दिल्ली | भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. या अविश्वास ठराकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. भाजपाकडे बहुमत असून देखील मतदान भाजपाचे सदस्य भाजपाला मतदान करणार नाहीत असे देखील बोलले जात होते. परंतु शुक्रवारी दिवसभरात सर्व पक्षांची मते जाणून घेतल्यानंतर उशीरा मतदान घेण्यात आले. त्यावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने केवळ १२६ मते, तर मोदी सरकारच्या बाजूने ३२५ मते पडल्यामुळे या अविश्वास प्रस्तावात मोदी सरकारने विश्वास जिंकल्याचे चित्र पहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने हा अविश्वास ठराव मांडला होता. मोदी सरकारकडे लोकसभेत आवश्यक संख्याबळ असल्याने हा अविश्वास प्रस्ताव पारित होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या ठरावादरम्यान काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा लोकसभेत मांडला. या सर्व घडामोडींनंतर झालेल्या मतदानात भाजपाच्या पारड्यात ३२५ मते पडल्यामुळे मोदी सरकारचा विजय झाला.

Related posts

तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू

News Desk

दिल्ली विधानसभेचे बिगुल वाजले, आजपासून आचारसंहिता लागू

News Desk

ED कडून दाऊदची बहिण हसिना पारकरच्या घरी छापेमारी

Aprna