HW News Marathi
राजकारण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन नाशिकहून नेण्यास केंद्राचा नकार

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुचर्चित अशा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकहुन वळविण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राकडे केली होती. मात्र, केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी फेटाळल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान मोदींकडे ‘बहुचर्चित असा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकहून नेण्यात यावा’ यासाठी मागणी केली होती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्रालाही लाभ घेता यावा, यासाठी ही मागणी करण्यात आली होती.मात्र ही मागणी केंद्राकडून थेट फेटाळण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

युतीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका सुरु

News Desk

अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारच्या दौ-यावर

News Desk

“सावरकरांप्रमाणे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नसून…”, संजय राऊतांचा मुख्यमंत्री-भाजपला टोला

Aprna
राजकारण

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टॉलिवूडने केले मतदान

News Desk

हैदराबाद | तेलंगाणामध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (७ डिसेंबर) सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक नेता आणि टॉलीवूडच्या अनेक सुपरस्टार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

दक्षिण सिनेमातील मेगास्टार चिरंजीवी यांनी कुटुंबियांसोबत हैदराबाद येथील जुबिली हिल्स येथील बूथ क्र. १४८ तर स्टाइलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी देखील जुबिली हिल्स येथील बूथ क्र. १५२ येथे जाऊन मतदान केले आहे. दुसरीकडे कॉमेडी आणि अॅक्शन स्टार एनटीआर, पत्नी आणि आईसोबत मतदान केले आहे. अभिनेता महेश बाब आणि पत्नी नम्रता शिरोडकर यांनी मतदान केले आहे.

याव्यतिरक्त बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामाऊली आणि अभिनेता नागार्जुन अक्किनेनी यांनी मतदान केले आहे.या सर्व अभिनेत्यांनी नगारिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तेलंगणामध्ये ११९ विधानसभेच्या जागांसाठी मतदान सुरू आहे. तेलंगणामधील ही निवडणूक केसीआर यांची अग्निपरीक्षा असल्याचे सांगितले जाते. राज्यातील मतदान शांतेत पार पडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Related posts

कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी देशातील जनतेला करणार संबोधित

News Desk

काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीतच, परंतु शरदराव तुम्हीसुद्धा ?

News Desk

मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार ?

News Desk