HW News Marathi
राजकारण

वाढत्या महागाईमुळे आता पिशवीतून पैसे अन् खिशातून सामान आणावे लागेल !

जळगाव | “देशात आज महागाई इतकी वाढत आहे कि आता पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील हे जनतेने लक्षात घ्यावे” असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केले आहे. “मुलींना छळले जात असल्याने मुली आत्महत्या करत आहेत. शेतकरी ही सुखी नाही. तुम्हाला एवढं घडूनही दिसत नाही का ?” असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सव्वाशे कोटी लोकांनी शिरोदत्त मानले आहे. त्यामुळे सांगून मी ठेवतो राज्यातील कुठल्याही महिलेला किंवा कुटुंबांना त्रास दिला, त्यांना न्याय दिला नाही तर मी गप्प बसणार नाही”, असा इशाराही छगन भुजबळ यांनी यावेळी दिला आहे. “यांना राम मंदिर बनवायचे नाही. यांना सरकार बनवायचे आहे. पुन्हा एकदा जातीजातीमध्ये भांडणे लावून तुम्ही मुर्ख आहात हे दाखवून दयायचे असे काम हे सरकार करत आहे”, असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.

“एवढे सुंदर महाराष्ट्र सदन बांधले परंतु बनवणारा मात्र जेलमध्ये गेला. १०० कोटीचे कॉन्ट्रॅक्ट होते. मग मला साडेआठशे कोटी कसे मिळतील ?”, असा सवाल यावेळी छगन भुजबळ यांनी केला. “छगन भुजबळ थांबणार नाही, घाबरणार नाही म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर पंगा झाला. मग तुम्ही काय आहात ?” असेही छगन भुजबळ यांनी विचारले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे कुटुंबियांकडून रोशनी शिंदेंची भेट; तब्येतीची केली विचारपूस

Aprna

‘ईव्हीएम’वर अविश्वास म्हणजे जनतेवर अविश्वास, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

News Desk

आज थेट ‘शिवसेना भवनावर’ धडकला विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचा मोर्चा

News Desk