HW News Marathi
राजकारण

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा गोंधळ

नवी दिल्ली | संसदेचे कामकाज आज (२० डिसेंबर) सुरू होताच पुन्‍हा गदारोळ सुरू झाला. विरोधकांनी राफेलप्रकरणी संयुक्‍त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी करत, तर टीडीपी सदस्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत गोंधळ घालला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्‍थगित करण्यात आले. लोकसभेचे कामकाजही सुरुवातीला दुपारी १२ आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने कामकाज स्‍थगित करावे लागत आहे. राफेल करार आणि शीख दंगलप्रकरणी न्यायालयाच्या निकालावरून काँग्रेससह विरोधकांचा संसदेत गोंधळ सुरू आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशमधील तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी राज्याला विशेष दर्जाची मागणी लावून धरत गोंधळ घातल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. आज टीडीपी सदस्यांनी महात्‍मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.

राज्यसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर सभापती व्यंकय्‍या नायडू यांनी त्यांना शांततेचे आवाहन करत सभागृहात राफेल, शेती आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगितले. परंतु, सभागृहात गदारोळ कायम राहिल्याने कामकाज स्‍थगित करण्यात आले. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सदस्यांनी गोंधळ घातल्याने अध्यक्षांनी सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज स्‍थगित केले. १२ वाजता पुन्‍हा कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ कायमच राहिला त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशानंतर आज प्रथमच शरद पवार साताऱ्यात

News Desk

“कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे…,” राऊतांचा बंडखोरांना इशारा

Aprna

राजन साळवींच्या कुटुंबियांना ACB ची नोटीस; “तिकडे जाणारे सर्व नेते…”

Aprna
व्हिडीओ

संत एकनाथ शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

News Desk

सामाजिक न्यायविभागा कडून चालवण्यात येणाऱ्या मुंबईच्या चेंबूर येथील संत एकनाथ शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यी बूधवार सकाळ पासुन आमरण उपोषणाला बसले आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन वसतिगृहात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. या वसतिगृतील जवळपास १२० विद्यार्थ्यी या उपोषणात सहभागी झाले आहे. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी त्याठीकाणी भेट देऊन चर्चा करावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समजुन घ्यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

Related posts

त्या’ जुन्या खटल्यामुळे Devendra Fadnavis अडचणीत, कारवाई होण्याची शक्यता?

News Desk

ग्रामपंचायत निवडणुकीत गुलाल ‘भाजप’चाच! देवेंद्र फडणवीसांचा दावा

News Desk

बंधारा बचावासाठी सांगलीकरांनी मानवी साखळी करत विरोध दर्शविला

News Desk