HW News Marathi
राजकारण

काँग्रेसला शरद पवारांसारखा मोठा वकिल लाभला आहे !

मुंबई | “काँग्रेसला शरद पवारांसारखा मोठा वकिल लाभला आहे. शरद पवारांना देखील काँग्रेसची वकिली करण्याव्यतिरिक्त दुसरा उरलेला नाही”, अशी खोचक टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. शरद पवार यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसची बाजू घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

“ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याबाबत काँग्रेसकडून उत्तर मिळणे अपेक्षित आहे. या आधीपर्यंत मोठ्या तावातावाने बोलणारे आता गप्प का ?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. यावेळी ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याबाबत काँग्रेसची बाजू घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार हे काँग्रेसचे वकील आहेत. त्यांच्याकडे काँग्रेसची वकिली करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरलेला नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

काय होते शरद पवारांचे वक्तव्य ?

शरद पवार यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेसची बाजू घेत भाजपवर निशाणा साधला होता. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात सोनिया गांधींचे नाव घेणे हा विरोधकांना संपविण्याचा कट असल्याचा आरोप शरद पवार यांनी सरकारवर केला होता. त्याचप्रमाणे, “देशात अनेक पंतप्रधान झाले मात्र त्यांनी विरोधकांना अडचणीत आणण्याकरिता कधीही सत्तेचा गैरवापर झाला नाही. मात्र विद्यमान सरकारकडून मात्र विरोधकांना अडचणीत आणण्याकरिता सत्तेचाच वापर करण्यात आला”, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk

राज्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित | मुख्यमंत्री

News Desk

धनंजय मुंडेच्या गैव्यवहाराचा मुद्दा सभागृहाता गाजला

News Desk
राजकारण

सेनेचे नेते सुरेश कालगुडेंच्या अपघाती मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल

News Desk

मुंबई | रायगडमधील शिवसेना नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचे रविवारी (३० डिसेंबर) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले आहे. कालगुडे यांच्या गाडीला महाड एमआयडीसी (MIDC) जवळ त्यांच्या अंगावरुन ट्रेलर गेल्याने कालगुडेंचा मृत्यू झाला आहे. मात्र कालगुडेंचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी आरोप केला आहे.या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात आणि या कटामध्ये सहभागी असल्याप्रकरणी झुआरी कंपनीचे मालक व प्रशासन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुरेश कलगुडे यांचा अल्प परिचय

सुरेश कलगुडे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते मानले जाते. आमदार भरत गोगावलेंच्या जिल्हा परिषदेच्या रिक्त जागी सुरेश कालगुडे हे शिवसेनेकडून जिंकून गेले. रायगड जिल्हा परिषद सदस्य ते रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते असा त्यांचा प्रवास होता. महाडमधील बिरवाडीमधून जवळपास सात वर्षे ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य होते. सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा नेता आणि प्रत्येत अडचणीवेळी धावून येणार नेता म्हणून सुरेश कलगुडे यांची ओळख असल्‍याच्या भावना स्‍थानिक नागरिक व्यक्‍त करत आहेत.

Related posts

“रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, MSRDC, MMRDA, महापालिकांनी त्वरित कार्यवाही करावी, ” मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

भाजपसाठी २०१९ मध्ये राम मंदिराचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा !

News Desk

जोरमथंगा यांनी घेतली मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk