HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसच्या आमदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

पंढरपूर | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारण रंगले असताना शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आपल्या पदाचा राजीनामा दिला. मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ अशी घोषणा त्यांनी दिली होती. सरकारने आरक्षणाचे अद्यादेश काढले नाहीत म्हणून बोललेला शब्द पाळत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत नाना भालके यांनी देखील राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावाने त्यांनी राजीनामा लिहला आहे.

सरकारने आतापर्यत आरक्षणाबाबत कोणतेच ठोस पाउल उचलले आमदार भालके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या अगोदर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न | आव्हाड

News Desk

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Aprna

फडणवीसांच्या कार्यकाळात तब्बल ६५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा

News Desk
देश / विदेश

आर्थिक निकषावर आरक्षण, केंद्रात प्राथमिक चर्चा

News Desk

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावरून संपुर्ण महाराष्ट्र पेटतानाचे चित्र सध्या दिसत आहे. मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले आहेत. तरी देखील सरकारने लक्ष दिले नाही. म्हणून मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेला आहे. सर्व जातींना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने यावर प्राथमिक चर्चा सुरू असून चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

गेल्या तीन दिवसात मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनकांनी आरक्षणासाठी औरंगाबादच्या गोदावरी नदी पात्रात काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या करून आपल्या प्राणाची आहुती दिली. यानंतर मराठा समाजाने मंगळवारी महाराष्ट्र, बुधवारी मुंबई बंदची हाक दिली. या बंदामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील ठिकठिकाणी तोडफोड-जाळपोळच्या घटना घडल्या आहेत.

भारतीय संविधानाच्या कलम ३६८ द्वारे घटना दुरुस्तीची तरदूत करण्यात आली आहे. संसदेतील उपस्थित असलेल्या सदस्यापैकी दोन तृतीयांशपेक्षा कमी नाहीत, अशा संख्येने मंजूर करता येते. त्यानंतर राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. देशात आतापर्यंत १२३ वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत.

तसेच महाराष्ट्रातील मराठा समाज, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जट आणि राजस्थानात गुर्जर देशातील या राज्यात आरक्षणाासाठी आंदोलन काढण्यात आली आहेत. यानंतर देशातील विविध राज्यातून आरक्षणाची वाढती मागणी पाहता. केंद्र सरकार आरक्षणावर चर्चा करत आहे.

Related posts

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

#AeroIndia2019 : ‘एरोइंडिया’च्या शो दरम्यान कार पार्किंगला भीषण आग

News Desk

…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता !, फडणवीसांचा टोला

News Desk