HW News Marathi
राजकारण

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नराधमांना मृत्यूदंड

नवी दिल्ली | लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार असल्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मृत्यूदंडाच्या शिक्षेला परवानगी दिली आहे. पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

१२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकाराने कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले होते. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पॉस्को कायद्यात बदल केले असून यापुढे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

असा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल

News Desk

#RamMandir : राम मंदिर नको विद्यापीठ उभारा !

News Desk

मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र, जीवे मारण्याची दिली धमकी

News Desk
देश / विदेश

रद्द केलेल्या तिकीटमधून रेल्वेची १४०० कोटींची बेगमी

News Desk

नवी दिल्ली : रेल्वेचे आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठीचे शुल्क वाढविल्याचा रेल्वेला चांगलाच फायदा झाला आहे. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांच्या शुल्कातून रेल्वेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल १४०० कोटी रुपयांची बेगमी केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण करण्याबरोबरच आरक्षण रद्द करणेही रेल्वेच्या पथ्यावर पडत आहे.

तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कामध्ये रेल्वेने नोव्हेंबर २०१५ मध्ये दुप्पट वाढ केली. त्यामुळे वर्षभरात १४00 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहीती रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेत दिली. नोव्हेंबर २०१५ पासून प्रवाशाने एसी ३ टियरचे तिकीट ४८ तासआधी रद्द केल्यास १८० रुपयांचे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. त्याआधी ही रक्कम केवळ ९० रुपये होते. याच पद्धतीने एसी २

टियरचे तिकिट रद्द केल्यास १०० रुपयांऐवजी २०० रुपये शुल्क आकारणे सुरू झाले. तसेच स्लीपर क्लासमधील कन्फर्म तिकिट रद्द केल्याबद्दल प्रवाशांकडून ६०रुपयांऐवजी १२० रुपये आकारणे सुरू केले आहे आणि सेकंड क्लासचे तिकिट केल्यास त्यासाठी ३० ऐवजी ६०रुपये शुल्कआकारणी सुरू केली आहे.

याशिवाय प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास रेल्वे त्या आसनावर अन्य प्रवाशांची व्यवस्था करतेच. त्यामुळे तिथेही पैसा मिळतो. त्यापैकी अनेक तिकिटे तत्काळद्वारे घ्यावी लागतात आणि अर्थातच त्यासाठी प्रवाशांना जादा पैसा मोजावा लागतो. यासर्व गोष्टींमुळे रेल्वेचा महसूल वाढत आहे.

Related posts

दीर्घ चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ मतांनी मंजूर

News Desk

राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिमांचा हातभार

swarit

आयोगाच्या आधीच भाजप आयटी सेल प्रमुखानं जाहीर केली मतदानाची तारीख

News Desk