HW News Marathi
राजकारण

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नव्हते !

मुंबई | राज्यात भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन होईल”, असा पुनरुच्चार नितीन गडकरी यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, “अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नव्हते”, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटले आहे. यापूर्वी देखील नितीन गडकरी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर नितीन गडकरी म्हणाले होते कि, “मी केंद्रात आहे त्यामुळे राज्यात येण्याचा प्रश्नच नाही. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन होईल.” त्याचप्रमाणे, आज (८ नोव्हेंबर) नितीन गडकरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी ?

  • राज्यात देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार.
  • गरज पडल्यास मध्यस्थी करायला तयार.
  • अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नव्हते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Aprna

भाजपने ईडीची भीती दाखविल्यानेच शिवसेना युतीसाठी तयार !

News Desk

आज संध्याकाळी एनडीएच्या नेत्यांची बैठक अन् डीनर पार्टी

News Desk