HW News Marathi
राजकारण

राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नका | उद्धव ठाकरे

मुंबई | दहीहंडीच्या दिवशी उत्साहाच्या भरात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणा-या राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राम कदमांच्या या बेताल वक्तव्यावर अनेक राजकारण्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी पत्रकार परीषद घेऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राम कदमांचा चांगलाच समाचार घेतल्याचे पहायला मिळाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राम कदमांवर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने कारवाई करावी. तसेच अशी विधाने करणाऱ्यांना कोणीही पक्षात घेऊ नये, कुणीही उमेदवारी देऊ नये.माता भगिनींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

रघुराम राजन यांना पुन्हा का बोलवता?

आजच्या सामना संपादकीय मधून रुपयाचे मुल्य घसरले आहे यावर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, महागाई तर आहेच आणि त्याचा विरोध आम्ही सत्तेत राहून करत आहोत. जर भाजप सरकारने नोटबंदीच्या वेळी रघुराम राजन यांना चुकीचे ठरवले तर मग त्यांना सध्या परत बोलवण्यासाठी प्रयत्न का सुरू आहेत? नोटाबंदी बाबत आमची भूमिका कळण्यास त्यांना दोन वर्ष लागली.

बेटी भगाव असा नारा आहे का? ठाकरेंचा सरकारला सवाल

पंतप्रधान मोदींनी देशात बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देत मुलींच्या शिक्षणाचा प्रचार तसेच मुलींच्या संरक्षणासाठी प्रचार सुरु केला आहे. तर दुसरीकडे भाजपाचे आमदार अशी वक्तव्य करतात तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या या उपक्रमांवर सवाल उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच”, राष्ट्रवादीची मिश्किल टीका

Aprna

जैश-ए-मोहम्मदचा पुळका कोणाला आहे हे जगाला माहित आहे !

News Desk

ठाकरे कुटुंबियांविरोधातील बेहिशेबी संपत्तीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna