HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…नाशिक मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण सर्वच मतदान करत असतो. मात्र ज्या नेत्याला पक्षाला आपण मत देतो त्याची माहिती करुन घेणेही महत्वाचे असते. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. महाराष्ट्रातील मतदानाचे ३ टप्पे पार पडले आहेत. तर आता फक्त चौथा आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे. हा चौथा टप्पा २९ एप्रिलला पार पडेल.

आज आपण जाणून घेणार आहोत चौथ्या टप्यातील नाशिक मतदार संघाबाबत. नाशिक लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. यामध्ये सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली आणि इगतपुरी या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

नाशिक मतदार संघातून यावेळी शिवसेनेकडून हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भूजबळ तर वंचित बहूजन आघाडीकडून पवन पवार लोकसभेसाठी उभे ठाकले आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाकडून वैभव अहिरे तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवार नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत.

नाशिक मध्ये २०१४ ची स्थिती

नाशिकमध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून हेमंत गोडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून छगन भूजबळ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ. प्रदीप पवार लोकसभेच्या मैदानात होते. त्यापैकी भाजपच्या हेमंत गोडसे यांचा ४,९४,७३५ मतं मिळून विजय झाला होता. तर राष्ट्रवादीच्या छगन भुजभळ यांना ३,०७,३९९ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पहिला तर १,८७,३३६ इतक्या मतांनी हेमंत गोडसे यांचा विजय झाला होता. तसेच यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास भाजपला ३१ %, राष्ट्रवादीला १९ %, तर मनसेला ३ % मतं मिळाली होती.

नाशिकमधील मतदार संख्या

नाशिकमधील एकूण १८,५०,९४६ इतके मतदार आहेत. येथे ८,७८,३९२ इतकी महिला मतदारांची संख्या आहे. तर ९,७२,४८७ इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे.

नाशिक मतदारसंघाचा इतिहास

नाशिक येथील विधानसभेची स्थिती पहिली तर ३ ठिकाणी भाजपची सत्ता आहे. तर २ मतदारसंघात शिवसेना आणि एका मतदारसंघात कॉंग्रेसची सत्ता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शहर आणि ग्रामीण असा जोडला गेला आहे. या मतदारसंघात ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे निवडणुकीत ग्रामीण भागालाही विशेष महत्त्व दिले जाते. यावेळची नाशिकची निवडणूक चुरशीची असल्याचे बोलले जात आहे. कारण, समीर भुजबळ यांनीही नाशिकच्या विकासाला चांगली गती देण्याचे काम केले, त्यांनी अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. रस्ता चौपदरीकरण, नाशिकमधील महत्त्वाचा विषय एअरपोर्ट असेल.

नाशिक बोटक्लब यांसह अनेक प्रकल्प समीर भुजबळ यांच्या काळात पूर्ण झाले असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे मितभाषी असलेले खासदार हेमंत गोडसे यांनीही शहरात विकासकामे काही प्रमाणात केली आहेत. जे काही मोठे प्रकल्प आहेत त्यांचाही त्यांनी पाठपुरावा केला. नाशिक-मुंबई लोकलसेवा सुरू व्हावी, तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची युनेस्कोमध्ये नोंद करावी, विमानसेवा, पाणी प्रश्न असे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प शहरातील पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. तेव्हा आता यावेळी नाशिककर भुजबळ यांना संधी देतात की भाजपच्या हेमंत गोडसे यांना अजून ५ वर्षे मिळातात हे निकालानंतरच कळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MeToo : एम. जे. अकबरांवर आणखी एका महिला पत्रकाराचा गंभीर आरोप

News Desk

शेताच्या बांधावर जाऊन अजितदादांचा शेतक-यांशी वन टू वन

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रम

Gauri Tilekar