HW News Marathi
राजकारण

शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

मुंबई | महाराष्ट्रातील सर्व बँकानी शेतकऱ्यांना सरळ पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे. सदर पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी ,सध्या खरीप पीक घेण्याची वेळ आहे आणि कर्जाचे धीम्या गतीने वितरण झाल्यास ते शेतकऱ्यासाठी फायद्याचे होणार नसल्याचे म्हटले आहे.

तसेच सर्व मंत्र्यांना पीक कर्जाच्या वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि खाजगी बँकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. पावसाच्या आगमनानंतरही बँक मंद गतीने कर्ज वितरीत करत आहेत. तर राज्य सरकारने ऐतिहासिक कर्ज माफी दिली होती. त्यामुळे आता नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, असा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपमधून बाहेर पडणे वेदनादायी !

News Desk

शरद पवार यांची भाजप सरकारवर सडकून टीका

Gauri Tilekar

पूरग्रस्तांना नवीन घरे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्य सरकारची घोषणा

News Desk