HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशींनी केली पंतप्रधान मोदींवर जातीय टिका

नवी दिल्ली | राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. अशातच पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार सभांचा जोरही वाढू लागला आहे. नाथद्वारा मतदारसंघात प्रचार करताना एका सभेत कॉंग्रसचे नेते सीपी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, साध्वी प्रज्ञा, साध्वी ऋतंबरा, उमा भारती यांच्यावर जातीय टीका केली आहे. त्यामुळे भजप नेत्यांना आयता मुद्दाच हाती मिळाला आहे.

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशी नाथद्वारमध्ये प्रचार करीत आहे. त्यावेळी त्यांनी उमा भारतींची जात लोधी आहे. ऋतंबरा, साध्वी प्रज्ञा याही सवर्ण नाहीत. मोदींची जात तरी काय आहे ? आणि हे सगळे हिंदुधर्माबद्दल बोलत आहेत. या देशात फक्त ब्राह्मण आहेत जे हिंदू धर्माबद्दल बोलत नाहीत म्हणूनच या देशाची दिशाभूल होते आहे. धर्म आणि राजकारण दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ५० वर्षांत यांना शिंग फुटली आहेत, अशी टीका केली. नंतर ट्विटरवरुन याबद्दल दुःखही व्यक्त केले आहे.

राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला मतदान आहे. तेव्हा कुठलाही धोका न पत्करता राहुल गांधींनी सावधगिरी बाळगत लगेच जोशींच्या विधानावर ट्विटवरून नाराजी व्यक्त करुन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. जोशींच्या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर जातीय विद्वेषाचे राजकारण करण्याची टीका करत हा मुद्दा उचलून धरला आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

निवडणुका जवळ आल्यानं राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून भाजपा जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हा विषय अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांचा निकाल आला की काँग्रेसच अयोध्येत राम मंदिर उभारेल, अशी घोषणा सी. पी. जोशी यांनी सभेत केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भारत जोडो यात्रेत ‘मविआ’च्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

Aprna

निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली !

News Desk

राज्यातील विधानसभेतील २० प्रमुख चुरशीच्या लढती

News Desk