HW News Marathi
राजकारण

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार परिवर्तन यात्रे’ला सुरुवात

महाड | देशात आणि राज्यातील भाजपची उलथून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेला आज (१० जानेवारी) सकाळी ८ वाजता रायगड येथून सुरुवात केली आहे. रायगड किल्ले येथील राजमाता जिजाबाई यांचे समाधीस्थळ येथील छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यात्रेला सुरुवात केली आहे.

१५ लाख गेले कुठे? अच्छे दिन आले कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित करत सरकारला धारेवर धरण्याचा आजपासून निर्धार परिवर्तनाचा, राष्ट्रवादी काँग्रेसनी घोषणा देत यात्रेला सुरुवात केली आहे. या परिवर्तन यात्रेमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले आहेत. ही निर्धार परिवर्तन यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाणार असून राज्यातील जनतेला सरकारच्या मनमानी कारभाराची जाणीव करून देऊन जनतेचे सहकार्य घेणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी म्हणतात, एक दिवस पर्यटक भारतातील शौचालये पाहण्यासाठी येतील

News Desk

घर का भेदी लंका ढाये

Gauri Tilekar

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले आभार

Aprna