HW News Marathi
राजकारण

HW Exclusive | पक्ष न्याय देईलच, आमच्या पक्षाचं धोरण जरा वेगळं आहे !

बुलढाणा | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्हाला विधानसभेवर घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते प्रत्यक्षात आले नाही, असे प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना मिश्कीलपणे हसत अमोल मिटकरी म्हणाले की, “पक्ष काय न्याय करेलच. मी कोणतीही मागणी, अपेक्षा घेऊन पक्षाकडे गेलो नव्हतो. अजितदादांचं आणि पक्षश्रेष्ठींचं माझ्यावर तेवढं प्रेम आहेच. राजकारणात जोपर्यंत काही प्रत्यक्ष मिळत नाही तोपर्यंत काही खरं मानू नये. पण मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्यांना त्यांना पक्ष न्याय देणार. इतर पक्षांपेक्षा आमच्या पक्षाचं धोरण जरा वेगळं आहे.” राज्यात सद्यस्थितीत अनेक मुद्द्यांवर सुरु असलेल्या राजकारणावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्याशी आमचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी बातचीत केली.

“राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार ५ वर्षे चालेल. म्हणूनच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून हे सरकार उदयास आले आहे. आता आम्ही भाजपचे असे अनेक वेगवेगळे घोटाळे उघडकीस आणू. आता हळूहळू त्यांचे सगळे घोटाळे निघतील. त्यात सुधीर मुनगंटीवार यांचा ३३ कोटी वृक्षलागवडीचे घोटाळा आहे. त्यामुळे, त्यांनी आमचे सरकार किती वर्षे चालेल याची चिंता त्यांनी करू नये. आमचे सरकार ५ वर्षे सुरळीत चालेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. विधानसभेच्या प्रचारादरम्यान मला एक समजलं कि, लोकांना परिवर्तन हवं होतं. आता अखेर लोकांना ते परिवर्तन मिळालं आहे”, असेही अमोल मिटकरी यावेळी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रात १ हजार जाहीर सभा

News Desk

भाजपच्या खासदारांना व्हीप जारी

News Desk

भारतरत्न हा केवळ सवर्ण,  ब्राह्मणांचा क्लब !

News Desk