HW News Marathi
राजकारण

मी शिवसेना सोडली कारण….!

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेते अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली ?, या प्रश्नाची जोरदार चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. त्यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच प्रचाराच्या सांगता सभेत स्वतः अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली ? याचे उत्तर जाहीर सभेमध्ये दिले आहे. “मला साताऱ्यामधून खासदार उदयनराजेंविरुद्ध लढण्याची विचारणा केल्याने मी शिवसेना सोडली”, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी यावेळी केला आहे.

“मी शिवसेनेत असताना मला सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात होता. मात्र छत्रपतींच्या गादीशी कधीच गद्दारी करणार नाही ही भावना मनात धरून बाहेर पडलो”, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यामुळे अखेर इतके दिवस अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. आता शिवसेना अमोल कोल्हे यांच्या या आरोपाला काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुकचे १५ हजार लाइक्स मिळवून देणार विधानसभेचे तिकीट ?

News Desk

पुलवामा दहशतवादी हल्ला हा गोध्रा हत्याकांडासारखाच भाजपचा पूर्वनियोजित कट !

News Desk

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक संपली; बंडखोराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Aprna