HW News Marathi
राजकारण

गरज पडली तर संघ राम मंदिरासाठी आंदोलन करेल | भय्याजी जोशी

मुंबई | भाईंदरच्या म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. राम मंदिर बांधले जावे ही सर्वांचीच इच्छा आहे. संघाने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान कधीही केलेला नाही. काही अडचणी जरूर येतील. परंतु न्यायालयाने हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन निर्णय द्यावा,अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे राममंदिरासाठी गरज पडली तर पुन्हा आंदोलन उभारणार असल्याचा इशारा जोशी यांच्याकडून देण्यात आला आहे.

“राम मंदिर हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. राम मंदिर अयोध्येतच होणार. मात्र खटला न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा आधी निकाल लागायला हवा. राम मंदिरासाठी जमीन अधिग्रहण करण्याची मागणी मोठया प्रमाणावर होत आहे. त्यामुळे यासाठी कायदा आणायला हवा”, अशी मागणी देखील भय्याजी जोशी यांनी केली आहे. राममंदिर प्रकरणाचा निकाल लागण्यास होणारा विलंब वेदनादायी असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडणं गैरच- रावसाहेब दानवे

News Desk

चव्हाण ७०,००० कोटी खर्च केले…पाणी कुठे गायब झाले ?

News Desk

मर्यादित वेळेनंतर फटाके फोडल्याने मुंबईत २ अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल

Gauri Tilekar