HW News Marathi
राजकारण

जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचा राजीनामा

श्रीनगर | भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला आहे. मेहबुबा यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपुर्द केला असून सायंकाळी चार वाजता पीडीपीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पीडीपीचे प्रवक्ते रफी अहमद मीर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपसोबत मिळून आम्ही योग्य प्रकारे सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. भाजप सत्तेतून बाहेर पडत आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. याबाबत आम्हाला कोणतेही संकेत देण्यात आले नसल्याचे ते यावेळी बोलताना म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला

News Desk

एका निरपराध व्यक्तीच्या मृत्यूला राहुल गांधी जबाबदार !

News Desk

पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरु होण्यापूर्वी भाजप, टीएमसीच्या कार्यकर्त्यांची हत्या

News Desk
राजकारण

युती तुटल्याचा आम्हाला आनंद | राऊत

News Desk

श्रीनग| जम्मू-काश्मीरमध्ये मोठी राजकीय घडामोड झाली आहे. भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याने पीडीपी सरकार कोसळले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्याच्या जम्मू-काश्मीरच्या एकूण राजकीय परिस्थितीवर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी प्रतिक्रिया ही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने उठवल्यानंतर भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव निर्माण झाल्या असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक, कठुआ गँगरेप याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्याचा मंगळवारी युती तुटल्यानंतर शेवट झाला असेच म्हणावे लागेल. युती तुटल्यानंर भाजपाने जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करावी अशी मागणीही यावेळी भाजपने केली आहे.

Related posts

शंकरसिंग वाघेला राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?

News Desk

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील !

News Desk