HW News Marathi
राजकारण

जितेंद्र आव्हाडचे प्रकाश आंबेडकर यांना उत्त्तर

मुंबई | मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातल्यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादीकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी कोणासोबत जावे, हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी विनाकारण आमची बदनामी करू नये, नाहीतर आम्हीही त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी दिलाय.

आघाडीच्या काळात गृहविभागाने मिलिंद एकबोटे यांची संघटना आणि सिमी यांच्याविरोधात बंदी आणण्याचा प्रस्ताव दिला होता. पण शरद पवारांनीच त्यांना त्यावेळी पाठिशी घातले होते. त्यामुळे शरद पवारांनी आपल्याला तोंड उघडायला भाग पाडू नये, असा गर्भित इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. त्यावर राष्ट्रवादी विरूद्ध प्रकाश आंबेडकर असा सामना रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“तुमच्यासारखा नामर्द नाही”, संजय राऊतांच नारायण राणेंना सडेतोड उत्तर

Aprna

पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

News Desk

#LokSabhaElections2019 : पोटी जन्म घेतला म्हणजे राजकीय प्रश्न कळतीलच असे नाही !

News Desk
राजकारण

भुजबळ समर्थक राज दरबारी

News Desk

मुंबई | छगन भुजबळ समर्थक आमदार, खासदारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. गेल्या दोन वर्ष्यापासून भुजबळ यांच्यावर अन्याय सुरु आहे. सुडाचे राजकारण सुरु आहे, त्यांना जमीन मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहेत. आमचा विकास काराहृहात कोंडला गेलाय.

नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही, अशी तक्रार भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन केली. राज यांनी देखील भूजबळावर अन्याय झाल्याचे मान्य केले. यापुढे भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे असे राज यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज यांना भेटण्यासाठी आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी जिरवा, माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी खासदार देविदास पिंगळे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राधाकृष्ण सोनावणे आदी हजार होते.छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याबरोबरच बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील कलम 45 लावले होते. त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत जामीन मिळालेला नाही.

Related posts

“…तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील”, राज ठाकरेंचा इशारा

Aprna

राज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न !

News Desk

आता हैदराबादचेही नाव बदलणार ?

News Desk