HW News Marathi
राजकारण

दिल्लीत ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेल्याचा केजरीवालांचा दावा

नवी दिल्ली | दिल्लीतील सातही जागांवर आम आदमी पक्षच विजयी होईल अशी आशा होती. मात्र, आता आयत्या वेळी डाव पलटला आहे. अगदी शेवटच्या क्षणी ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेल्याचा दावा आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीतील मुस्लिम मते काँग्रेसला कशी गेली याचाच शोध आम्ही घेत असल्याचे देखील केजरीवाल यांनी यावेळी म्हटले आहे.

“अगदी मतदानाच्या ४८ तासांपर्यंत आम्हाला असे वाटत होते की, ‘आप’ला दिल्लीतील सातही जागांवर विजय मिळेल. मात्र, आयत्या वेळी ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेली. आम्ही या गोष्टीचा शोध घेत आहोत कि, दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसला कशी गेली ?”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावेळी ‘आप’ला किती जागांवर विजय मिळेल या प्रश्नाचे उत्तरे देणे देखील केजरीवाल यांनी टाळले आहे.

“ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदींचे पुन्हा सत्तेत येणे शक्य नाही. तसेच केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सरकारव्यतिरिक्त जे सरकार स्थापन होईल त्यास आम्ही पाठिंबा देऊ. मात्र, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे वचन देणाऱ्यालाच आमचा पाठिंबा मिळेल”, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी

News Desk

लोकसभेच्या २ महिन्यांपूर्वीच अर्जुन खोतकर अन् आमच्यात सेटलमेंट झाली होती !

News Desk

भाजपला संविधानाला हातही लावू देणार नाही

News Desk