HW News Marathi
राजकारण

सारंग यांच्या निधनाने मराठी रंगभूमी-चित्रपट क्षेत्राची मोठी हानी | विनोद तावडे

मुंबई | ‘सखाराम बाईंडर’, ‘कमला’, ‘रथचक्र’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार नाटकांमध्ये आणि ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’ सारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भुमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या निधनाने मराठी रंगभूमी – चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करून लालन सारंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात तावडे यांनी म्हटले आहे की, विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर, कमला या गाजलेल्या नाटकांमधून कमला आणि चंपा या दोन व्यक्तिरेखा अत्यंत धाडसाने साकारणाऱ्या लालन सारंग यांनी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी लक्षवेधी भुमिका साकारल्या आहे. कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले होते. आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या लालन सारंग यांच्या निधनामुळे रंगभूमीने अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावले आहे, असेही तावडे यांनी शेवटी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

News Desk

“सर्व आमदार उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार,” एकनाथ शिंदेंची माहिती

Aprna

…तर तिवरे धरण फुटले नसते

News Desk
देश / विदेश

कोलकातामधील कालव्यात बस कोसळून, ६ जणांचा मृत्यू

swarit

कोलकाता | पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण आपघात घडला आहे. या अपघातात ६ जणांता मृत्यू झाला असून २२ जाणांपैकी २ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात मंगळवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घटना घडील आहे. ही बस कोलकाताच्या दिशने जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुकेश जैन यांनी दिली आहे. बस पुलावरील कठड्याला धडक बसल्याने कालव्यात कोसळली आहे.

 

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा, हा तर ओबीसींवर घोर अन्याय !

News Desk

INX Media Case : चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही, तर ईडीकडून लूकआऊट नोटीस

News Desk

देशातील एकूण कोळसा उत्पादनात ७४.७८ दशलक्ष टनांची वाढ

Aprna