HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता ?

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळ्या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्वपक्षातील बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यामुळे हे दिग्गज नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस एकूण ७६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अडचणीत येण्याची असल्याचा दावा तक्रारदारांच्या वकिलांनी केला आहे.

तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह ७६ मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांच्या आत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (२२ ऑगस्ट) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) दिले होते. त्यानुसार सोमवारी (२६ ऑगस्ट) माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४९१, १२० (ब) यांसह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएससी बँकेतील गैरव्यवहार उघड झाला असून अनेक राजकीय नेते अडचणीत सापडले आहेत.

या बँकेतील संचालक मंडळाने तसेच कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यपणे व सवलतीच्या दरांत कर्जांचे वितरण केले. अशा कर्जांची परतफेड न झाल्याने बँक वाईट अवस्था आली आणि सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले, असे नाबार्ड बँकेने २०११ मध्ये केलेल्या ऑडिटमधून स्पष्ट झाले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला या बँकेवर प्रशासक नेमण्याचा आदेश काढावा लागला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाचा एटीआर आज विधानसभेत मांडणार

News Desk

महाभारतात इंटरनेट सेवा असल्याचा भाजप मंत्र्याचा दावा

News Desk

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

Aprna