HW News Marathi
राजकारण

माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे यांनी त्यांचा उपसभापदीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाकरे यांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्यासाठी केवळ आठ दिवस शिल्लक असताना त्याचा राजीनामा देण्यामागचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

विधानपरिषदेत संख्याबळ वाढल्यामुळे या सभागृहाचे महत्त्वाचे उपसभापतीपद मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहेत. परंतु कार्यकाळ संपण्यापूर्वीच ठाकरेंनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. तर भाजपमधून कोणत्या नेत्याची उपसभापतीपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचा दर १२८ टक्के

News Desk

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; आज आणि उद्या शिंदे गटाचा युक्तीवाद

Aprna

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही !

News Desk
मुंबई

रस्त्याच्या दुरावस्थेप्रकरणी पालिकेकडून कंत्राटदारांवर करवाई

News Desk

मुंबई | घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडच्या रस्त्यांच्या दुरावस्थेनंतर महापालिकेने कंत्राटदारांवर कारवाई करत १ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंग रोडची देखभाल करण्याची जबाबदारी ही बीपीएससीपीएल आणि विशाल कन्स्ट्रक्शन यांच्या जॉईट व्हेन्चरची होती. या रस्त्याची देखभाल योग्य पद्धतीने न केल्यामुळे त्यांना पालिकेने एक लाख रुपयांचा दंड आकारला आला आहे.

ही दुरवस्था पाहूण पालिकेने आतापर्यंत कंत्राटदारांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती. परंतु आता कंत्राटदारांना चार दिवसांची मुदत देत एक लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील तीन किलोमीटर पॅचची अवस्था भीषण आहे. या भागात जागोजागी खड्डे असल्याच्या अनेक तक्रारी पालिका आयुक्तांकडे आल्या आहेत. यानंतर पालिका आयुक्तांनी एक बैठक आयोजित करून हा निर्णय घेतला आहे.

Related posts

विद्यार्थी भारती संघटनेच्या मुलींनी केले शॉर्ट ड्रेस घालून आंदोलन

News Desk

परळ टर्मिनसचा मुर्हूत अखेर ठरला, ३ मार्चला होणार सुरुवात

News Desk

विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा

News Desk