HW News Marathi
राजकारण

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा विधानभवनावर धडकणार

मुंबई | मराठा क्रांती मोर्चा प्रमुख वीस मागण्या घेऊन सोमवारी (२६ नोव्हेंबर) विधानभवनावर पुन्हा एकदा धडकणार आहे. या निर्णायक आंदोलनासाठी मराठा समाज आपल्या वाहनांसह मुंबईत दाखल होत असल्याने राजधानीत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर मराठा समाजाला किती टक्के व कोणत्या प्रवर्गातून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण सरकार देणार, याबाबत मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. त्यासाठी आरक्षणासह प्रमुख वीस मागण्यांसाठी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’ची हाक देण्यात आली आहे.

सोमवारी होणार्‍या आंदोलनासाठी १६ नोव्हेंबरपासून गावोगावी मराठा संवाद यात्रा काढून जनजागृती करण्यात आली असून, या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता लाखो मराठा बांधव सोमवारी मुंबईत धडकतील. तसेच हजारो वाहने मुंबईत दाखल होणार असल्याचा समन्वयकांचा दावा आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रदेशाध्यक्षपदी सिंधिया यांना नियुक्त करा, अन्यथा राजीनामे देऊ !

News Desk

निसर्गावर बोलू काही…

News Desk

जाणून घ्या… पंतप्रधान नरेंद्र मोदींची किती आहे संपत्ती

News Desk
राजकारण

पर्यावरण दिनी राजकीय प्रदूषण नको | अदित्य ठाकरे

swarit

मुंबई | आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त मुंबई येथील दादर चौपाटीवर बीच प्लीज या संस्थेने स्वच्छ समुद्र किनारा ही मोहिम हाती घेतली होती. या संस्थेत सर्व महाविद्यालयीन तरूण सहभागी झाले होते. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते.

यावेळी अदित्य ठाकरेंनी राजकीय साफसफाई पण सध्या सुरू आहे तसेच अमित शहा यांच्या भेटीवर भाष्य करणे टाळले. भाजप अध्यक्ष अमित शहा बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र, आज जागतिक पर्यावरण दिन असून या दिनी राजकीय प्रदूषण आणू इच्छित नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

२०१९ पर्यंत तरी प्लास्टिक मुक्त राहू काही वर्षांपूर्वी प्लास्टिक हे पर्याय म्हणून पाहिले जायचे पण आता हा पर्याय भारी पडतोय. पर्यावरण सुधारण्यासाठी माझे हे म्हणणे आहे. तसेच २०१९ पर्यंत तरी प्लास्टिक मुक्त राहू असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणालेत.

दादर चौपाटीवर पर्यावरण दिन साजरा

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दादरच्या चौपाटीवर स्वच्छता करण्यात आली. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गेले ४३ आठवडे बीच प्लीज या संस्थेने दादर येथील समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. संस्थेत सर्व महाविद्यालयीन तरूण सहभागी झाले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दादर येथे मंगळवारी भेट दिली.

Related posts

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk

संभाजी ब्रिगेडचा राजकारणात प्रवेश

News Desk

शरद पवार ‘माढा’ मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार ?

News Desk