HW News Marathi
राजकारण

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका निकाली काढली

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणावर विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. मराठा आरक्षण मागासवर्ग आयोगाने आपला अंतिम निर्णय राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकेवर बुधवारी (२१ नोव्हेंबर) मुंबई हायकोर्टात सुनावणीदरम्यान निकाली काढण्यात आली आहे.

निर्णय नवीन शैक्षणिक सत्र सुरू व्हायच्या आत घ्यावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालायने ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. अशा मागणीची याचिका विनोद पाटील यांनी न्यायालयात दाखल केली होती. न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर ही सुनावणी झाली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवालही उच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून याचिकेचा मूळ हेतू साध्य झाल्याचे याचिकाकर्त्यांनी कोर्टात सांगितले. तर राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हायकोर्टात दिली.

तसेच अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर भविष्यात त्यातील मुद्द्यांविषयी काही हरकती असल्यास पुन्हा उच्च न्यायालयात याचिका करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली असून ‘आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे निर्देश आयोगाला द्यावेत एवढीच आमची विनंती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘राज्य सरकारने रविवारी(१८ नोव्हेंबर)ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आयोगाच्या अहवालातील शिफारसी स्वीकारल्या आहेत. त्यानुसार, राज्य सरकारचा निर्णय व आयोगाच्या शिफारसी याआधारे कायद्याचे विधेयक बनवण्याची वैधानिक प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी यावेळी न्यायालयात दिली. खंडपीठाने ही बाबही आदेशात नमूद केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 सुरू,” संजय राऊतांची टीका

Aprna

आमच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाही !

News Desk

“आयुष्यातून उठविण्याचे काम युवा सेना प्रमुखांनी केले”, राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Aprna
राजकारण

स्वराज यांच्या निर्णयावर बोलले पी चिदंमबरम

News Desk

भोपाळ | परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हि निवडणुक लढणार नाहीत स्वराज यांच्या या निणर्याचे सध्या राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. सुषमा स्वराज यांच्या आगामी लोकसभा निवडणुक न लढविण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत याचा अंदाज घेत निवडणुकीपूर्वीच माघार घेतली आहे. स्वराज यांच्या या निर्णयाचा संबंध चिदंमबरम यांनी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीशी लावला आहे.

Related posts

मनोज तिवारी लष्करी गणवेशात बाईक रॅलीत सामील, विरोधकांकडून टीका

News Desk

…तर राज्यात नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात !

News Desk

जाणून घ्या… शिंदे सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Aprna