HW News Marathi
राजकारण

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई | रत्नागिरी येथील नाणार हे गाव आंबा उत्पादन, पर्यटन मच्छिमारीसाठी संपन्न आहे. सध्या नाणार येथे मोठी रिफायनरी आणण्याचा सरकारचा निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ग्रामस्थ एकवटले आहेत. या प्रकल्पाला १५ गावातील लोकांनी विरोध दर्शवला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हा प्रकल्प नाणार मध्ये होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. परंतु सेना भाजपच्या राजकारणात न पडता कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या पदाधिका-यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली . लवकरच या प्रकरणावर तोडगा काढू असे आश्वासन यावेळी राज यांनी भेटीसाठी आलेल्या पदाधिका-यांना दिले आहे.

कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना या प्रकल्पाविरोधात राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन आपल्या विरोधाला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरेंनी रत्नागिरीत जाऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी १४ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. पुढे ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेलार, मुनगंटीवारांना योग्य पद न देण्यावरून धनंजय मुंडेंची सरकारविरोधात मिश्कील घोषणाबाजी

Aprna

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

News Desk

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी नियमांचे उल्लंघन

News Desk
महाराष्ट्र

बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत होणार | मुख्यमंत्री

News Desk

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या नियोजित जागेची पाहाणी केली. १४ एप्रिल २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

या स्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून पुढील वर्षापासून काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे मुख्यमंत्री म्हटले. तसेच इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्य स्मारक असेल. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकास स्मारकाच्या भव्य उंचीमुळे वांद्रे-वरळी सी लिंकवरु नही दर्शन घेता येईल. ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे.

मुख्यमंत्री या जागेची पाहाणी करताना त्यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस.मदान, स्मारकाचे वास्तू विशारद आणि प्रभू असोसिएट्सचे शशी प्रभू आदी मंडळी उपस्थित होते.

 

Related posts

मराठवाड्यात राष्ट्रवादीची उद्यापासून हल्लाबोल यात्रा

swarit

सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला’ – केशव उपाध्ये

News Desk

आता पोलीस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मुंबईत हक्काचे घर

News Desk