HW News Marathi
राजकारण

निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या दावणीला बांधलेले आहे !

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना आचरसंहितेचे उल्‍लंघन केल्‍याच्या आरोपातून पंतप्रधान मोदींना आतापर्यंत तब्‍बल ९ वेळा क्‍लीन चिट दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. “जनतेच्या मनात लोकाशाहीबाबत विश्वास निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. मात्र, निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या दावणीला बांधलेले आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

“९ हजार कोटींचा खर्चून उभारण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत जर लोकांच्या मनात याबाबत शंका असेल तर ती शंका दूर करणे हे सरकारचे काम आहे. मात्र, सरकार ते करण्यासही तयार नाही”, असेही मलिक यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (७ मे) ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची एकत्रित मतमोजणी करण्याची मागणी करणारी विरोधकांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर देखील राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “व्हीव्हीपॅट व ईव्हीएममध्ये तफावत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाही निवडणूक आयोग यावर मार्ग काढण्यास तयार नाही”, असे मलिक यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा विकास का घसरतो याचीच टोचणी !

News Desk

तुम्ही ‘त्यांनी’ दिलेले पैसे घ्या, मात्र मत ‘आप’लाच द्या !

News Desk

…मग राम मंदिर बांधायला जावे !

Gauri Tilekar