HW News Marathi
राजकारण

चेंबूर सामुहिक बलात्काराची एसआयटी चौकशी करण्याची राष्ट्रवादींची मागणी

मुंबई | जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. यानंतर पडितेने एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी (३० ऑगस्ट) संपला. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेत, मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला.

या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. यानंतर पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तत्काळ अटक करून करण्यात यावे. “या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा,” अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, माणुसकीच्या नात्याने आम्ही पीडित कुटुंबाच्या मागे उभे आहोत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याचे प्रकार वाढत यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

हा भव्य मोर्चा चेंबूर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलीस ठाणे असा काढण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक आणि राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीच्या आमदार विदया चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसे नाही झाले तर यापेक्षा मोठया पध्दतीचा व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते!

swarit

जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल !

News Desk

उद्धव ठाकरे आज दुष्काळ दौऱ्यावर

News Desk