HW News Marathi
राजकारण

बीड जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार

बीड | राज्यात सध्या भीषण दुष्काळस्थिती आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या प्रश्न गंभीर आहे. याच दुष्काळात होरपळत असलेल्या बीड जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. ४० हजार लिटर क्षमतेचे २१ पाण्याचे टँकर ऍग्रीकलचर ट्रस्टमार्फत बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रोहित पवार यांच्या हस्ते आज या पाण्याच्या टॅंकरचे लोकार्पण झाले.

बीड जिल्ह्यातील आणखी १०० गावांमध्ये सुमारे १० लाख लिटर क्षमतेचे हे टँकर पाणीपुरवठा करतील, अशीही माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात आणखी ९ टँकर लवकरच दाखल होणार आहेत. दरम्यान, देशातील लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांना राज्यातील भीषण दुष्काळ स्थितीचा विसर पडला होता. मात्र, लोकसभा निवडणूक संपताच आता सर्व राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा राज्याकडे आपले लक्ष्य केंद्रित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case : पी. चिंदबरम यांना ईडी अटक करू शकत नाही

News Desk

राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल, तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निवडून द्या !

News Desk

पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टीकरण देत म्हणाले…

Aprna