HW News Marathi
राजकारण

छत्तीसगडमध्ये नवे पर्व

नवी दिल्ली | छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार हे अखेर निश्चित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे नाव गुलदस्त्यात असल्यामुळे कोण मुख्यमंत्री होणार या उत्सुकता दाटून राहिलेली होती. छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बागेल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या घोषणेनंतर काँग्रेसने सहाव्या दिवशी भूपेश बागेल यांचे नाव जाहीर केले आहे.

छत्तीसगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेश बागेल यांच्या नावावर रविवारी मुख्यमंत्री पदासाठी मोहर लावण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजता बाघेल मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बागेल व्यतिरिक्त सिंहदेव, साहू आणि चरण दास महंत हे देखील होते.

रविवारी दुपारी विधान परिषदेच्या बैठकीत बागेल यांच्या नावावर मोहर लावण्यात आली आहे. राज्यात १५ वर्षांनंतर पक्षाने दोन तृतीयांश बहुमत मिळविले आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत ९० सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ६८ जागा जिंकल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत ?

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तीनपैकी एका आरोपी डॉक्टरला अटक

News Desk

स्मारके कुणाला हवी आहेत? आम्हाला तर शाळा आणि रुग्णालये पाहिजेत !

News Desk
राजकारण

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी

News Desk

मुंबई |अयोध्या दौ-या नंतर शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे आता पंढरपुरात जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तिरावर देखील आरती करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन सरकारने दुष्काळाबाबत विविध उपाययोजना करावी तसेच अयोध्येत राम मंदिर बांधण्याची सुबुद्धी सरकारला यावी यासाठी उद्धव ठाकरे विठ्ठलाकडे साकडे घालणार आहेत.

दुष्काळ प्रश्नाविषयी सरकारला जागे करण्यासाठी २४ डिसेंबर रोजी सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच येथूनच निवडणुकांचे रणशिंग फुकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या ‘विठाई’ या नव्या एसटी सेवेचा देखील शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

Related posts

प्रेक्षक गॅलरीतून दिसणारे मुंबईचे दृश्‍य डोळ्याचे पारणे फेडणारे !

News Desk

आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू !

News Desk

#LokSabhaElections2019 : विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय

News Desk