HW News Marathi
राजकारण

कोणताही पक्ष १०० टक्के सर्वोत्तम नाही | भागवत

नागपूरदसऱ्याच्या निमित्ताने नागपुरमध्ये आरएसएस कडून शस्त्र पूजा तसेच संचलन करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अनेक विषयांना भागवतांनी हात घातल्याचे पहायला मिळाले. राम मंदिरसाठी कायदा करा असा हि प्रस्ताव त्यांनी मांडला. भागवत म्हणाले की,देशातील कोणताही पक्ष १००टक्के सर्वोत्तम नाही. परंतु जो बरा आहे त्यांना निवडा , राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या पक्षाचा विचार करा. असे बोलताना भागवत यांचा कल भाजपाकडे होता.

जनतेने १०० टक्के मतदान करायला पाहिजे. देशाचे नेतृत्व कोणी करावे प्रत्येकाने ठेवावे. ‘नोटा ‘चा उपयोग करू नये. त्यामुळे अपात्र उमेदवाराला त्याचा फायदा होतो, असे ही भागवत म्हणाले . पक्षीय आणि जाती- पातीच्या राजकारणापासून स्वयंम संघ नेहमीच लांब आहे. उमेदवाराची राष्ट्रीय प्रेम, राष्ट्र भक्ती, राष्ट्रीय एकात्मता पाहूनच उमेदवाराला मतदान करा ,भागवत यांनी सांगितले. सोशल मीडियावर प्रक्षोभकपणे पोस्ट टाकून देशविरोधी अभियान चालविण्याचे काम शहरी नक्षलवादी करत आहेत. राजकीय आंदोलनामध्ये असेच चेहरे आता घुसत आहेत,’भारत तेरे तुकडे होंगे’असे म्हणणारे अनेक जण यात येत आहेत,पूर्वी फक्त माओवादच शहरी होता,असे भागवत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या सुधीर मुनगंटीवारांचे वनमंत्रीपद जाऊ शकते | राज ठाकरे

Gauri Tilekar

मी बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

News Desk

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो !

News Desk