HW News Marathi
राजकारण

आता पंतप्रधान मोदी आम्हाला राष्ट्रवाद शिकवणार का ?

भोपाळ | ‘पंतप्रधान मोदी अनेकदा काँग्रेसवर टीका करतात. मग ज्या काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध लढा दिला आहे त्यालाच आता पंतप्रधान मोदी आम्हाला राष्ट्रवाद शिकवणार का ?’ असा प्रश्न काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ‘पंतप्रधान मोदींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या त्यांच्या पक्षातील एका नेत्याचे तरी नाव सांगावे, असे खुले आव्हान देखील कमलनाथ यांनी यावेळी दिले आहे.

मध्य प्रदेशात निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. या टीकेला आता कमलनाथ यांनी उत्तर दिले आहे. ‘पंतप्रधान मोदी देशातील रोजगार संधींबाबत का नाही बोलत ? शेतकरी आत्म्यहत्यांविषयी का नाही बोलत ? ते फक्त राहुल गांधी आणि राष्ट्रवादाबाबतच का बोलतात ? पंतप्रधान मोदींना राहुल गांधींची एवढी काळजी का ?’ असा प्रश्नही कमलनाथ यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या संविधानाचे रक्षक आहेत !

News Desk

अखेर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यपालांची घेणार भेट

Aprna

आमच्या ‘या’ काही उत्साही नेत्यांना दुसरे काम देण्याची गरज !

News Desk
मुंबई

अशी असेल माल्ल्याची आर्थर रोड कारागृहात व्यवस्था

News Desk

मुंबई | भारतीय बँकांचे तब्बल ९००० कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये मोठी तयारी सुरु आहे. आर्थर रोड कारागृहामधील बराक क्रमांक १२ चे रूप संपूर्णपणे पालटण्याचे काम सध्या सुरु आहे. बराकमधील रंगकाम, टाइल्स तसेच बाथरूमची दुरुस्ती आणि नूतनीकरणाला गेल्या महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे.

माल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून कारागृहाच्या २ कोठड्यांच्या दुरुस्तीचे आणि नूतनीकरणाचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमेश कन्स्ट्रक्शन्स यांच्याकडे कारागृहाच्या दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना आर्थर रोड कारागृहातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच याआधी कारागृहाच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल देखील इंग्लंडला पाठविण्यात आला आहे.

परंतु, कारागृहामध्ये डागडुजीची आवश्यकता असल्याने हे काम करण्यात येत आहे, असे स्पेशल आयजी दक्षिण मुंबई राज्यवर्धन सिन्हा यांचे म्हणणे आहे. तसेच कारागृहातील सर्वच कोठड्यांच्या दुरुस्तीचे आणि रंगकामाचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थर रोड जेलमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची सोय नसल्याचे माल्ल्याने लंडन कोर्टात सांगितले होते. त्यानुसार सूर्यप्रकाशाच्या प्रतिबिंबासाठी कोठडीमध्ये एका भिंतीवर काळा रंग लावण्यात आला आहे.

Related posts

धारावीतील निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळून १ मृत्यू, ३ जण जखमी

News Desk

स्थायी समितीच्या सदस्य पदावरुन सेनेच्या २ नगरसेवकांचे राजीनामे

swarit

भुलाबाई देसाई रोडवरील गाळ्यांना भीषण आग

News Desk