HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज तहकूब

मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज (२६ नोव्हेंबर)ला विधिमंडळात गदारोळ सुरू झाला आहे. या गदारोळामुळे विधिमंडळाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे. यानंतरही विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका कायम असल्यामुळे पुन्हा एकदा कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

राज्यभरात मराठा मोर्चा आंदोलकांची धरपकड केला जात असल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. राज्य सरकार या आंदोलकांची धरपकड करून मराठा मोर्चा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला आहे. तसेच विरोधकांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधिमंडळात मांडण्याची मागणी लावू धरली.

हा अहवाल मांडल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका यावेळी विरोधकांनी केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोधकांवर पलटवार करताना पूर्वीच्या सरकारने राणे समितीचा अहवाल मांडला नव्हता असे उदाहरण देऊन उपरोधात्मक टोला हणला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडेची टीका

News Desk

राज ठाकरे-आशिष शेलार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार !

News Desk