HW News Marathi
राजकारण

तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला, परंतु रावणराज जास्तकाळ चालत नाही !

मुंबई | “पवारांची टीम आता संपली आहे. आता राज्यात आमचीच टीम काम करणार आहे. रावणराज जास्तकाळ चालत नाही, रामराज्य येतेच”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

“सोलापूर जिल्ह्यातील समाजकारणात असलेली सर्व मंडळी आमच्याशी जोडली गेली आहेत. तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला. परंतु, रावणराज जास्तकाळ चालत नाही, रामराज्य येतेच. कल्याणराव तुमच्यावर कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा. मग मी त्याच काय करायचे ते बघतो”, असेही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. “ज्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी स्वतःचा स्वार्थ नव्हे तर समाजाचा विचार केला. ओपनींग बॅटसमन म्हणून कॅप्टन मैदानात उतरले. पण, बॅट्समनच पळून गेला”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk

पश्चिम बंगाल सरकारने योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीला परवानगी नाकारली

News Desk

विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही !

News Desk