HW News Marathi
राजकारण

बाळासाहेबांच्या मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी अखेर मागे घेतली आहे. हे प्रकरण आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचे सांगत जयदेव ठाकरे यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल संशय व्यक्त केला होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यातला संपत्तीवरून वाद उफाळून आला होता. त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टातही गेला. जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू होती. जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने सध्या याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता. “हे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले होते. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही”, असा दावा जयदेव यांनी केला होता. परंतु यानंतर मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

Aprna

राष्ट्रपती निवडणूक २०२२; निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना

Aprna

भाजपकडून सनी देओल गुरुदासपूर, तर किरण खेर यांना चंदीगडमधून उमेदवारी

News Desk
राजकारण

शिवस्मारकाच्या प्रकल्पास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

swarit

मुंबई | अखेर अरबी समुद्रातील छत्रीपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवस्मारकाच्या प्रकल्पाच्या अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

त्या याचिकेत म्हटले आहे की , राज्य आधीच कर्जाच्या खाईत असताना शिवस्मारक बांधण्यासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसेच राज्यापुढे अशा अनेक समस्या असतानाही राज्य सरकार शिवस्मारकासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणार आहे.अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे १६ हजार मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचा दावा एका याचिककर्त्यांने केला होता. तर दुस-या एका याचिकेत सरकारने जनसुनावणी घ्यावी, अन्यथा अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम थांबवावे ,अशी मागणी करण्यात आली होती. तसेच अरबी समुद्रातील शिवस्मारकाला भेट देण्याऱ्या पर्यटकांकडून ३६०० कोटी रुपये प्रकल्प खर्च ‘पर्यटन शुल्का’च्या स्वरूपात वसूल करण्याबाबत सरकार विचार करत आहे.

Related posts

इथून पुढे जातीय दंगलीत वाढ होणार – राज ठाकरे

News Desk

काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमदेवारी, मिलिंद देवरा नवे मुंबई अध्यक्ष

News Desk

‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Aprna