HW News Marathi
राजकारण

मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ !

मुंबई | मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली आहे, असा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. राज्यात भाजपचे सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये १४ वाघांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये १६ आणि २०१७ मध्ये तब्बल २१ वाघांचा मृत्यू असल्याचे निरुपम यांनी यावेळी म्हणाले आहे. निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघीणच्या हत्यावरून भाजप सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघिणी हत्येप्रकरणावरून मुनगंटीवार यांचा खरपूस समाचार केला आहे.

निरुपम पुढे असे देखील म्हटले की, अवनी वाघीण हत्या प्रकरणी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्यावर कारवाई करायला हावी. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली आहे. शिवाय, मुनगंटीवार हे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत आहेत, त्याच्यासोबत ते पैसे कमवत आहेत, असा गंभीर आरोपदेखील निरुपम यांनी केला आहे. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा. पण वाघांना ठार मारल्याच्या घटना पाहता सुधीर मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे वादग्रस्त विधान निरुपम यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जे राम मंदिराला विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे कठीण होईल | संजय राऊत

News Desk

…तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही !

Gauri Tilekar

भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू !

Gauri Tilekar
मुंबई

सुरक्षित ठिकाणी घर मिळण्यासाठी, माहुल प्रकल्पग्रस्तांचे १३ दिवसांपासून आंदोलन सुरू

News Desk

मुंबई | मुंबईत अनेक प्रकल्पामुळे तिथल्या रहिवाशांना मूळ ठिकाणाहून स्थलांतर करून, माहुलमध्ये पुनर्वसन केले जाते. माहुल हा परिसर रिफायनरी युक्त असल्याने ते ठिकाण निवासासाठी योग्य नाही. तरी सुद्धा मुंबईतील अनेक प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये पुनर्वासित केले जाते. माहुल प्रकल्पग्रस्तांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर निकाल देताना प्रकल्पग्रस्तांना १ ऑक्टोबरपर्यंत योग्य ठिकाणी घर द्यावीत किंवा घरभाडे द्यावे, असे आदेश दिले. पण राज्य सरकार या दोन्ही पर्यायांपैकी कोणत्याही एका निर्णयाची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरले.

राज्य सरकार सतत उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांनी २८ ऑक्टोबरपासून, विद्याविहार येथील आंबेडकर नगर २ इथे ‘जीवन वाचवा आंदोलन’ सुरू केले आहे. या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी उपस्थिती लावून प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनांना पाठिंबा दिला. गेल्या १३ दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. पदपथावर आंदोलनकर्ते बसले आहेत. ते रात्रंदिवस आपल्या कुटुंबापासोबत उपस्थित असतात.

नक्की समस्या काय आहे ?

मुंबईतील तानसा जलवाहिनी आणि विद्याविहार भागातल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचे गेल्यावर्षी माहुल गाव येथे पुनर्वसन करण्यात आले. माहुलला राहायला आल्यापासून गेल्या वर्षभरात, इथल्या प्रदूषणामुळे १०० पेक्षा जास्त जणांचा जीव गेला. तसेच इथल्या दूषित वातावरण आणि हवेमुळे अनेक प्रकल्पग्रस्तांना आजार जडले आहेत.

माहुल प्रकल्पग्रस्त आधी ज्या भागात राहत होते, तिथे जवळपासच्या भागात प्राथमिक सोयी, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या. पण माहुलला स्थलांतर केल्याने रोजगाराचा आणि एकूणच सर्वच प्रश्न आवासून उभे राहिले. माहुल परिसर कुर्ला स्थानकापासून भौगोलिक दृष्ट्या फार लांब आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक प्रकल्पग्रस्तांना त्याचा त्रास होत आहे.

सरकार अजून किती जणांचे जीव घेणार ?

राष्ट्रीय हरित लवादाने , माहुल परिसर राहण्यालायक नाही असे सांगितले. तरी सुद्धा आता सायन मधील रहिवाशांचे माहुल मध्ये पुनर्वसन करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आता सरकार किती जणांचे नाहक जीव घेणार आहे? हा प्रश्न उपस्थित होतोय.

Related posts

पोकळ धमक्यांसाठी शिवसेनेचं नाव गिनीज बुकात नोंदवा – नितेश राणे

News Desk

माहिती देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजार रुपयांचा दंड

News Desk

माटुंग्यातील बिग बाजारमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी

News Desk