HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी चर्चेसाठी शरद पवारांच्या निवासस्थानी

नवी दल्ली | उत्तर प्रदेश तसेच बिहार राज्यामध्ये समाजवादी पक्ष व बसपाने भाजपला पोटनिवडणुकीत पराभूत केल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी जावून भेट घेतली. तिथे शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात तासभर चर्चा झाली. सलग दोन दिवसांतील ही दुसरी भेट आहे.

सोनिया गांधींनी दोन दिवसांपूर्वी मेजवानीच्या निमित्ताने भाजपविरोधातील समविचारी पक्षांशी अनौपचारिक बोलणी केली होती. आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.

या डिनर डिप्लोमसीनंतर राहुल गांधींनी संपर्क अभियानाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात मोदी विरोधकांची मोट बांधण्यासाठी राहुल गांधी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही भेटण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता मोदी राफेल घोटाळ्यातून कमावलेल्या पैशाने आमदार विकत घेत आहेत !

News Desk

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

News Desk

कॉंग्रेसच्या आमदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

News Desk
मुंबई

आगामी निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार

News Desk

मुंबई | शिवसेनेच्या मुखपत्रातून जे छापून येईल, त्याकडे लक्ष्य देऊ नका आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढणार असल्याचा दावा” सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विरोधकांना उद्देशून केला. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यानंतर काहींना मंत्री बनण्याची घाई झाली आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केली.

२०१९मध्ये भाजपची सत्ता येणार की नाही यावर सर्वजण अदांज बांधून लागले होते. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी १९९९मध्ये असेच भांडले आणि पुन्हा एकत्र आले. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्यासने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळे न लढता एकत्र येऊ’ असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभागृत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले.

Related posts

विमानतळावर 15 किलो सोनं जप्त

swarit

भाजपचं सरकार गेलं तरच अच्छे दिन: अजित पवार

News Desk

मुंबई पोलिसांकडून दाऊदच्या पुतण्याला अटक

News Desk