HW News Marathi
राजकारण

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही !

मुंबई। नरभक्षक अवनी वाघिणीची शिकार केल्यानंतर भाजप सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारले असता. मुख्यमंत्र्यांनी सावध भूमिका घेत म्हटले की “वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट सर्वंना दु:खच झाले आहे. अवनीच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. मात्र, वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे आणि त्यानंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. परंतु त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल”,असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी केलेल्या टीकेनंतर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मेनका गांधी या सुरुवातीपासूनच प्राणीप्रेमी आहेत.अनेकदा त्या मला यासंदर्भात फोन करत असतात. प्राण्यांबाबतचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्या माझ्याकडे पाठपुरावा करत असतात. त्यांनी तीव्र शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“ना मुख्यमंत्री, ना नेता अशी महाराष्ट्राची परिस्थिती”, उद्धव ठाकरेंची खंत

Aprna

सामाजिक न्यायाची पुंगी गाजराची पुंगी ठरू नये | उद्धव ठाकरे

News Desk

“अनुराग ठाकूरजी आमची KDMC फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट…”, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला

Darrell Miranda
राजकारण

अवनी वाघिणीच्या क्रूर हत्येमुळे मला दुःख झाले !

swarit

मुंबई । “अवनीच्या अतिशय क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येमुळे मला दुःख झालं आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी ठार करण्याचे आदेश दिले आहेत. मुनंगटीवार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या वाघाच्या शिकारीपैकी ही तिसरी शिकार आहे. वाघिणीला बेशुद्घ करुन पकडणं शक्य होतं, मात्र तिला ठार करण्यात आलं. त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शार्प शूटरची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी त्यांचा अधिकृत ट्विट करून केला आहे.

मेनका गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सुधीर मुनगंटीवार अडचणीत आले आहेत. आपण याबाबत कायदेशीर आणि राजकीय कारवाईबाबत विचार करत असल्याचेही मनेका गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.आपण हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहोत. तसेच मुनगंटीवारांच्या आदेशाविरोधात कायदेशीर तसेच राजकीय लढाई लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे उत्तर

वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शिकेनुसार निर्णय घेतला’, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. वाघिणीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचाही विचार करावा लागतो, अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांना टोला लगावला.

”अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने वन कर्मचा-यांचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने तिला ठार मारावे लागले. मंत्री आणि सचिव मुंबईत मंत्रालयात बसून वनांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करत नाहीत. ते शेतकरी व अदिवासी करतात. त्यांच्यामध्ये खूप असंतोष होता. तो दूर केला नसता तर अखेरीस हेच लोक वन्यजीवांचे शत्रू झाले असते,’असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

Related posts

भारताची राजधानी वायू प्रदूषणाच्या विळख्यात

News Desk

‘मातोश्री’नंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संभाजी भिडे ‘वर्षा’वर

News Desk

आम्हाला आघाडीत घेण्याचा प्रयत्न हा केवळ त्यांचा दिखावा !

News Desk