HW News Marathi
राजकारण

मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही !

सातारा | “मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही,”असे सूचक विधान राष्ट्रवादींचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीनंतर केले. कोल्हेंच्या सूचक विधानाने उदयनराजेंच्या भाजप प्रवेश निश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उदयनराजेंच्या घरी आज (२ सप्टेंबर) गणरायाचे आगमन झाले. या निमित्ताने राष्ट्रवादीचे कोल्हेंनी उदयनराजेंच्या घरी हजेरी लावली. यावेळी कोल्हेंची उदयनराजेंसोबत बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडू नये, यासाठी कोल्हे त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले असल्याचे म्हटले जाते.

या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. बंद दाराआड चर्चा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हटले की, “छत्रपतींना माझ्या शुभेच्छा, मावळा छत्रपतींचे मन वळवू शकला नाही,” असे सूचक विधान करत कोल्हेंनी अप्रत्यक्षरित्या उदयनराजेंच्या भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगितले. यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे येत्या ५ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. उदयनराजेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. या पार्श्वभूमीवर त्यांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून अमोल कोल्हे साताऱ्याला जावून उदयराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो असफल ठरल्याचे कोल्हेंच्या विधानानंतर स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार आंदोलन ?

News Desk

शिवराजसिंह चौहान यांची दुतोंडी भूमिका ?

News Desk

ज्यांच्या रक्तात भारत आहे ते एअर स्ट्राइकवर संशय घेतील का ?

News Desk